चैतन्य लहरौ मराठी सप्टेंबर-ऑक्टोबर २०१२ ा। प२मेश्वराच्या २्वव्यापक शक्तीशी जोडल्याशिवाय व्यक्ती अशा यंत्रासा२खा या आहे जे नी ही आपल्या सतशी जोडले गेले आहे आणि ना ही ज्याचे काही अर्थ किंवा लक्ष्य आहे. व्यक्तिमत्त्व, अंकात औताशी संबंध आल्यानंतरच संपूर्ण तंत्र कार्य करू लागते तसेच आपली अभिव्यक्ती करू लागते. प.पू.श्री माताजी, १३.९.१९९५ कुंडलिनी आणि सत चक्र ...8 हेट य कृपया लक्ष द्या : २०१३ च्या सर्व अंकांची नोंदणी सप्टेंबर २०१२ ला सुरू होऊन ३० नोव्हेंबर २०१२ ला समाप्त होईल. कृण्डौलिनी आणि सात चक्र मतर स ाव सब मानवाला परमेश्वराने एवढ्यासाठी घडवले आहे की तो सुद्धा परमेश्वराचे एक फार मोठे साधन आहे. इतकेच नव्हे तर ते इतकं सुंदर साधन त्यांनी बनवलंय की त्या साधनाला परमेश्वर काय आहे ते कळतं. २३ फेब्रुवारी १९७९ अहमदनगरच्या नागरिकांनी इतक्या प्रेमाने आम्हाला निरमंत्रण पाठवलं त्याबद्दल आम्ही सर्वच आपले आभारी आहोत. त्यातूनही अहमदनगर जिल्हा म्हणजे मला विशेष वाटतो. कारण राहुरीला जे कार्य सुरू झालं आणि जे पसरत चाललं त्यावरून हे लक्षात आलं की या जिल्ह्यामध्ये काहीतरी विशेष धार्मिक कार्य पूर्वी झालेलं आहे. तसेच महाराष्ट्र हा एक आध्यात्मिक परिसर आहे. म्हणून अनेक संतांनी इथे जन्म घेऊन अनेक कार्य केलेली आहेत. सगळ्यात शेवटी सांगायचे म्हणजे साईनाथांनी आपल्याला माहिती आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये फार सुंदर कार्य केलेले आहे. ही सगळी तयारी अनादिकालापासून मानवामध्ये झालेली आहे. मनुष्य हा एक अमिबापासून वाढत वाढत आज या दिशेला पोहोचलेला आहे की तो परमेश्वराबद्दल विचार करू लागला. तो अमिबापासून या दशेला का आला? एवढी मेहनत त्याच्यावर का घेतली गेली? तो आज मानव स्थितीत येऊन तरी पूर्णत्वाला आलेला आहे की नाही? ज्यासाठी त्याला अमिबापासून त्या स्थितीला आणून सोडलेले आहे त्या स्थितीत येऊन तरी काय त्याला सगळं माहीत झालेलं आहे ? परमेश्वराबद्दल जे त्याच्यामध्ये कुतूहल आहे, काहीतरी उत्कंठा आहे, जिज्ञासा आहे. परमात्मा म्हणून कोणी तरी शक्ती संसारात आहे, असं प्रत्येक मानवाला वाटत असतं. ते त्यानं कसं जाणलं, कुठून जाणलं ? त्याबद्दल त्याने पुष्कळ पुस्तकं लिहिली आहेत, संतांची पूजा केलेली आहे. त्रास ही दिलेला आहे. अशा या मानवाला काहीतरी अर्थ असला पाहिजे. वायफळ कुणीतरी इतकी मेहनत केलेली नसणार. निदान परमेश्वराने तरी केलेली नसणार. जर समजा आम्ही हे एक यंत्र बनवलं. त्याचा आधी पाया घातला, त्याची सबंध व्यवस्था केली तर सहजच आपण विचाराल की 'माताजी, कोणासाठी ? काय आहे हे? काय बनवणं चाललंय? याच्यातून काय होणार?' हे सगळं बनवायलाच पाहिजे आधी, ही सगळी तयारी करायलाच पाहिजे. आणि सर्व तयारी झाल्यावरच जेव्हा आम्ही हे mains ला लावतो तेव्हा हे कार्यान्वित होतं. तसेच मानवाचे आहे. मानवाला परमेश्वराने एवढ्यासाठी घडवले आहे की तो सुद्धा परमेश्वराचे एक फार मोठे साधन आहे. इतकेच नव्हे तर ते इतकं सुंदर ते साधन त्यांनी बनवलंय की त्या साधनाला परमेश्वर काय आहे ते कळतं. माईकला कळत नाही, ह्याच्यातून जरी मी बोलत असले. ज्याने घडवलंय त्याला सुद्धा ते कळत नाही. याचा अवेअरनेस, जी चेतना आहे ती याच्यामध्ये नाही. ती मानवाला चेतना आधी परमेश्वराने दिली आणि मग ती आलोकित केल्यावर, enlighten केल्यावर तो हे समजू शकतो की परमेश्वराने मला का बनवलंय, आणि त्याची शक्ती त्याच्याकडून अशी अव्याहत वाहू लागते. ती जी शक्ती आहे तेच हे स्पंदन आहे. आता म्हणायला अत्यंत सोपं वाटतं, जसे चव्हाण म्हणाले ती खरी गोष्ट आहे. एका क्षणात ही गोष्ट घडते. अगदी एका क्षणात. इतकंही म्हटलं इंग्लिशमध्ये split of a second ही घटना इतकी सहजच घडली पाहिजे. कारण इतकी महत्त्वपूर्ण घटना आहे. उत्क्रांतीची ही शेवटची घटना आहे. आपण श्वास घेतो. जर तो विचार करून आणि चिकित्सा करून घ्यायला सुरुवात केली तर अर्धे लोक मुळी संपणार. जेवढ्या काही ६ महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या सहज आहेत. सहज. 'सह' म्हणजे with, 'ज' म्हणजे born. सहज म्हणजे आपल्याबरोबर जन्माला आलेलं किंवा आपला जन्मसिद्ध अधिकार म्हटला तर तो योगाचा आहे. शेवटी आपण काय आहोत. हे झालंच पाहिजे. हे घडलंच पाहिजे. पुष्कळांना मी म्हटलं की काही याच्यात मेहनत नाही केली तरच बरं. तर त्यांना आश्चर्य वाटतं माताजी असं कसं म्हणतात! पण आपण मेहनत करून परमेश्वराला बोलावू शकतो का? एखाद्या थेंबाने म्हटलं की मी मेहनत करून सबंध सागराला माझ्याकडे बोलावून घेईन. तर शक्य आहे हे? सागरालाच उतरायला पाहिजे त्या थेंबाला आपल्यामध्ये घेण्यासाठी. तसेच आहे हे. जर आपण काही म्हटलं आम्ही मेहनत करू, डोक्यावर उभे राहू किंवा आम्ही काही कसली तरी धावपळ करू, तर त्याने परमेश्वर मिळणार नाही. अशा प्रयत्नाने मिळणार नाही. पण जर तुम्ही स्थिरावलेले आहात, धार्मिक आहात आणि मध्य मार्गावर बसलेले आहात, अतिशय नाही कशामध्ये. अशा लोकांना ही घटना सहज झालीच पाहिजे. जसं झाडाला एक फळं लागतं. आधी एखादंच फळ लागतं जेव्हा झाड लहान असतं, नंतर दोन-चार आणखीन फळें येतात, पण शेवटी बहर येतो, आणि अनेक फुलांची फळे बनतात. तसेच आज विशेष वेळ आलेली आहे. हे कलियुगात घडायचे होते, घडत आहे आणि घडेल त्याबद्दल एवढा उहापोह कशाला असतो ते मला आजपर्यंत कधीच लक्षात आलेले नाही की असं का? तसं का? याबद्दल मला फार आश्चर्य वाटतं. अहो, उद्या जर मी म्हटलं इथे हिरा आहे, तर तुम्ही विचार कराल का? आधी धावत पळत घेऊन याल ना! मग सर्व जे जन्मजन्मांतराचे मिळवलेले आहे ते सहजयोगाने तुम्हाला जर प्राप्त होतं असं मी जर तुम्हाला म्हणते तर त्यात उहापोह कशाला करायचा? ही घटना घडविण्यासाठी अनेक अवतार संसारात आले त्यांनी तुमची सगळी काही तयारी केलेली आहे. ती कशी काय केलेली आहे. ते इथे मी दाखवलेले आहे. ते आपण बघावं म्हणजे आपल्याला थोडंसं समजावून सांगते. जे काही बाहेर हे शरीर दिसतं आहे हे कशाच्या दमावर आहे ? डॉक्टरांना जर विचारलं की काहो, पॅरासिम्पथॅटिक नव्व्हस सिस्टम म्हणजे काय आहे? तर ते म्हणतील की ही ऑटोनॉमस नव्व्हस सिस्टम आहे म्हणजेच स्वयंचलित आहे. पण हे स्वयं म्हणजे कोण? ते आम्हाला माहिती नाही. निदान या बाबतीत प्रामाणिक आहेत की आम्हाला ते माहीत नाही की ती कशी चालते? कशी कार्यान्वित असते ? ते आम्हाला माहिती नाही. म्हणजे आपण जेवल्याबरोबर आपलं अन्न कोण पचन करतं? आपला श्वासोच्छवास असा बरोबर कसा चालू असतो? त्यातूनही जर समजा तुम्ही धावत सुटले तर तुमच्या हृदयाची क्रिया वाढेल आणि हृदय धडधडू लागेल. ते तुम्ही करू शकता, पण ते हळू करण्याचे काम कोण करतं ? ही क्रिया कोण साधून घेतं ? असं जर तुम्ही डॉक्टरांना विचारलं तर ते सांगू शकत नाही. ते म्हणतील ते आमच्या सायन्सच्या पलीकडचं आहे. तसंच मानसशास्त्रात सुद्धा पुष्कळ लोकांनी प्रयोग करून पाहिलं आहे आणि असं सिद्ध केलं आहे की अशी कोणती तरी शक्ती आहे जी ऑल परवेदिंग आहे, सर्वव्यापी आहे. तिला ते ७ युनिव्हर्सल अनकॉन्शस म्हणतात आणि ती स्वप्नात येऊन तुमचं मार्गदर्शन करत असते आणि त्याच्यामध्ये काही प्रतीकरूपाने मार्गदर्शन येत असतं. एक प्रकारचा जर त्रिकोण दिसत असला तर तो इथं दिसो किंवा ऑस्ट्रेलियात दिसो किंवा अमेरिकेत दिसो त्याला एकच अर्थ असतो. पण ते सुद्धा एका स्थितीत पोहचून असेच म्हणतात की ह्याचे आम्ही काही सांगू शकत नाही. हे आम्ही जे बाहेरून आहे असेच दिसते. पण आतून कसं येत आहे आणि कसं कार्यान्वित होतं आहे ते आपल्याला दिसत नाही. आपला भारत हा फार मोठा देश आहे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की हा खरोखरच हा एक फार मोठा देश आहे कारण की ही एक योग भूमी आहे. इथल्या लोकांनी कधीही जास्त प्रपंच किंवा भौतिक गोष्टींकडे लक्ष दिले नाही. त्यांनी नेहमी या गोष्टींचा विचार केलेला आहे की मनुष्य हा संसारात का आला ? कसा आला? कुठून आला? त्याचा अर्थ काय आहे? आणि मनन करून, मेहनत करून तुमच्या पूर्वजांनी ही कमाई करून ठेवलेली आहे आणि याचा पत्ता लावून ठेवलेला आहे. फक्त फरक एवढाच आहे की ते कार्यान्वित झालं नव्हतं आणि ते आमच्या हातून आज घडत आहे. जसं की आज आपण ही वीज बघता. या वीजेला केवढा मोठा इतिहास आहे. वर्षानुवर्ष याच्यावर मेहनत केल्यावर मग एकाने याचा पत्ता लावला की अशा रीतीने वीज होते. समजा, जर त्याने पत्ता लावून आपल्यापुरतेच ठेवले असते किंवा दोन-चार लोकांना दिले असते तर आज तुम्ही मान्य केले असते का एडिसन एवढा मोठा मनुष्य होता. न्युटन एवढा मोठा मनुष्य होता. प्रत्येक भौतिकात सुद्धा सापडलेला शोध हा जनसाधारणाला मिळालाच पाहिजे. तसेच हे सुद्धा अध्यात्मातलं सगळ्यांना मिळालंच पाहिजे नाहीतर कुणाला विश्वास वाटणार नाही. तसेच जर आपण पाहिले तर एका अमिबापासून माणसं झालेले आहोत असं म्हणतात आणि ती गोष्ट खरी आहे. तेंव्हा सुद्धा सगळे अमिबा काही माणसं झालेली नाहीत. सगळ्या मासळ्या काही रेपटाईल झालेल्या नाहीत आणि सगळे रेपटाईल काही त्याच्या वरच्या वर्गाला गेले नाहीत. त्याच्यातही चयन होत असतं आणि त्या चयनाने उत्क्रांती होता होता आज आपण मानव स्थितीला आलो. जर ह्याच्यावरची कोणती स्थिती असेल इथे आपल्याला पोहोचायचे आहे. ज्याच्याबद्दल पुष्कळांनी इशारे केलेले आहेत आणि वर्णन केलेले आहे अशी जर कोणती स्थिती असेल तिथे सुद्धा थोडे बहुत चयन व्हायलाच पाहिजे आणि असं चयन होतं. सहजयोगामध्ये दहा माणसं आली तर कदाचित दोन लोकांना होत नाही. आता आम्ही कोवलमला होतो. तिथे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आमचा प्रोग्राम केला. म्हणजे पहिल्यांदाच गव्हर्नमेंटला काहीतरी सुज्ञपणा आलेला दिसतो. त्यांनी आमचा प्रोग्राम कोवलममध्ये केला होता. तिथे पत्रकार लोक आले होते. आता पत्रकार म्हणजे आपल्याला माहिती आहे की कोणत्या दर्जाचे असतात. काही-काही तर फारच अगदी विचित्र प्रकारचे असतात आणि आल्याबरोबर त्यांनी आम्हाला दारूबिरू द्या, नाहीतर आम्ही काही प्रोग्रामला येत नाही. आमची एवढी फी ठरलेली आहे. एक-एक ८ बाटली दिली तरी वगैरे वरगैरे, असे प्रकार सुरू केल्यावर मी सरळ सांगितलं की माझं काही छापायला नको तुम्ही. तुम्ही चालते व्हा इथून. आम्हाला मुळीच नको आहे तुमचं काही. त्याच्यावर ते रागावले आणि भलतं सलतं सहजयोगाबद्दल सुद्धा दोन-चार लोकांनी लिहिलंय. पण त्यातल्या त्यात काही लोकांना मी पार करून टाकलं. त्यामुळे काही लोकांनी चांगलं लिहिलं. काहींनी वाईट लिहिलं. जरी तुम्ही चांगलं वाईट काही लिहिले तरी सत्याला कधीही मागं घेता येत नाही कारण सत्य हे सत्यावरच उभे आहे तेव्हा तुम्ही जरी तुमच्या एकंदर शुद्रतेमुळे किंवा एखाद्या मूर्खपणामुळे तुम्ही काही चूक लिहिलं तरी सत्य हे सत्यच आहे. तेव्हा दहापैकी जर आठ माणसं पार होतात तेव्हा ही गोष्ट खरोखर आहे आणि झाली पाहिजे. आणि त्याचं प्रमाण आपल्याला अनेक दृष्टीने पहाता येते. आधी मी आपल्याला सांगते की काय आहे कुंडलिनी वगैरे आणि त्याचं प्रमाण कसं ओळखायचं ते पण तुम्हाला सांगते. जसं आता आपण माझं बोलणं ऐकत आहात, जे काही मी बोलत आहे ते आपल्या मनामध्ये येतं, ते आपण माझं ऐकता आणि ते सगळे आपलं जे गत आहे तिथे जाऊन बसतं. अशा रीतीने ही डावी कडची जी बाजू आहे ती इडा नाडी मानली जाते. तिला चंद्र नाडी सुद्धा म्हणतात आणि हठयोगात तिला 'था' नाडी म्हणतात. ही परमेश्वराची शक्ती आहे, ज्या शक्तीमुळे आपले अस्तित्व बनलेले आहे. अस्तित्व शक्ती आहे ही आणि हे जर आपल्याला पटत असेल तर मी असं म्हणेन की ही शिवाची शक्ती आहे. आणि हिला संस्कृत भाषेमध्ये महाकालीची शक्ती असं म्हणतात. महाकालीची शक्ती आहे. आता डॉक्टर लोक म्हणतील की आमचे येथे काही महाकाली नाही आहे. तर आपलं संस्कृत हे इंग्लिश भाषा येण्याच्या हजारो वर्षापूर्वी लिहिलं गेलं होतं. आणि ह्या गोष्टींचा त्याच्याही आधी हजारो वर्ष आधी पत्ता लागला होता. तेव्हा इंग्लिश लोकांनी आपली चिकित्सा करावी अशी त्यांची अजून लायकी आलेली नाही. डावीकडची जी इडा नाही आहे, ह्या नाडीमुळे आपल्या अस्तित्वाला सुरुवात झालेली आहे. आपलं अस्तित्व यावर अवलंबून असते आणि आपलं अस्तित्व नसतं तेव्हा आपण नष्ट होतो म्हणून पुष्कळदा याला डिस्ट्रॉयिंग शक्ती सुद्धा म्हणतात. नंतर ही जी उजवीकडे आपली शक्ती कार्यान्वित आहे, जी उजवीकडे आहे, ती वर जाऊन डावीकडे जाते आणि ही वर जाऊन उजवीकडे जाते. तर ही उजवीकडची शक्ती आहे त्या शक्तीने आपण आपली शारीरिक स्थिती, शारीरिक कार्य हे करत असतो आणि ह्या स्थितीने आपण आपलं बौद्धिक कार्य करत असतो. म्हणजे पुढचं प्लॅनिंग करायचे असले, पुढचा विचार असला की ज्याला आपण म्हणतो की आता आम्हाला हे आरगनाइझ करायचे आहे, आम्हाला हे व्यवस्थित करायचे आहे किंवा घरात बायका सुद्धा उद्या पापड करायचे की चटण्या करायच्या वर्गैरे वर्गैरे असे जे काही आपल्याला पुढचे विचार येत असतात, ज्याला आपण म्हणू आपल्या भविष्याचे जे काही आपण विचार किंवा त्याचे जे काही प्लॅन करत असतो ते सगळे या शक्तीने आपल्यामध्ये कार्यान्वित होतात. तसंच आपल्या शरीराचे कार्य म्हणजे आपण जर असं ठरवलं की उद्या आपण धावायला जायचं. तर जे आपण धावायला लागतो किंवा आपल्या शरीराची जी काही ९ 1र ा॥ गती होते ती सुद्धा खालच्या बाजूने होत असते म्हणजे खालची बाजू जी आहे ती त्या गतीसाठी असते. त्याला आपण असं म्हणू मेंटल अँड फिजीकल एक्झिस्टंस, जे काही आहे ते किंवा त्याचं जे काही कार्य आहे त्या कार्यासाठी उपयोगात येते. आता मधोमध जी शक्ती आहे त्या शक्तीला सुषुम्ना नाडी असं म्हणतात. सुषुम्ना नाडीतून ही शक्ती वहात असते. परमेश्वराची कार्यशक्ती जी आहे ती आपण पाहिली. उजव्या बाजूला जी पिंगला नाडी आहे त्याच्यातून कार्यान्वित होत असते आणि मधोमध जी सुषुम्ना नाडी आहे त्याच्यामुळेच उत्क्रांती झाली आहे. १० त्याच्यामुळेच आपल्यामध्ये धर्म स्थापन होतो. म्हणजे आता कार्बनला चार व्हेलन्सी असतात. आपल्यामध्ये जर केमिस्ट्रीचे प्रोफेसर असले तर त्यांना माहिती आहे की पिरिऑडिक लॉ मध्ये सबंध अगदी व्यवस्थित बसवलेले आहे सगळं. हे पाहिलं की आश्चर्य वाटतं की कुणी प्लॅनिंग केलं असेल आणि कसे एक- एक बरोबर सगळे एलिमेंट्स त्यांनी बसवलेले आहेत. तर कार्बनला जसं चार व्हेलन्सी आहेत किंवा सोनं आहे, सोन्याचा रंग जसा कधी खराब होत नाही. हा त्याचा धर्म आहे. तसाच मानवाचा धर्म याच सुषुम्ना नाडी मुळे बनतो. पहिल्यांदा ह्याच्यात धर्म बनतो आणि त्यानंतर त्याची उत्क्रांती होते. धर्म बदलत बदलत उत्क्रांती होते. आपल्या धर्मात आणि सोन्याच्या धर्मामध्ये फरक आहे. आपल्या धर्मात आणि एका प्राण्याच्या धर्मात फरक आहे. पण आता मानव धर्म बनल्यावरती त्याची पुढची स्थिती काय? ती धर्मातीत आहे. ती गुणातीत आहे. म्हणजे हे जे तीन गुण मी आता आपल्याला सांगितले आहेत, ते तमोगुण, रजोगुण आणि सत्त्वगुण मध्ये आहे. त्या गुणापलीकडे सुद्धा आपण जातो. ह्या मनुष्याच्या सीमित आल्यानंतरच की आता अशा स्थितीला आल्यानंतर की जिथे फक्त त्याला त्याचा मनुष्य अर्थ कळला पाहिजे. त्याला त्याच्या सर्वव्यापी शक्तीशी संबंधित केलं पाहिजे. आणि त्यासाठी जी आपल्यामध्ये शक्ती खाली स्थित आहे तिला कुंडलिनी असं म्हणतात. ही कुंडलिनी साडे तीन वेटोळे घालून त्याच्यात बसलेली आहे. पण ही एका टेपरेकॉर्डरमध्ये जसा टेप असतो तशी आपल्यामध्ये स्थित असते आणि आपल्यामध्ये जे काही गत असेल, जे काही पाप , पुण्य, जे काही आपण केलेले असेल ते सगळं त्याच्यात असतं, म्हणजे याच जन्मातलं नाही तर अनेक जन्मातलं सगळं काही त्यामध्ये विहीत असते. अशी ती कुंडलिनी आपल्यामध्ये खाली स्थित असते. जसं एखाद्या बी मध्ये त्याचा अंकुर असतो तसेच मानवामध्ये हा अंकुर, ही तुमची आई जन्मजन्मांतर तुमच्याबरोबर जन्माला येते आणि सगळें काही तुमचं जे असतं ते बघत असते आणि त्यावेळेची वाट बघत असते की जेव्हा हे कार्य घडेल आणि तुम्हाला पुनर्जन्म मिळेल. आता पूर्वीच्या काळी एक-दोन लोकांना असं झालं, पुष्कळसे लोक आपल्याला माहिती आहेत, असं आपण ऐकलेले नाही की पुष्कळसे लोक एकदम साधू झाले किंवा त्यांना परमेश्वराचा बोध झाला. ज्ञान मात्र लोकांना आहे. म्हणजे आपण ज्ञानेश्वरी वाचली, गीता वाचली, ११ इकडे गेलो पण बोध मात्र फार कमी लोकांना होतो. आणि त्यामुळेच सगळे घोटाळे उभे झालेले आहेत. सांगायचं म्हणजे कोणताही धर्म, कोणताही अध्यात्म करायचा म्हणजे पहिली गोष्ट आहे तुमच्या आत्म्याशी संबंध जोडलाच पाहिजे. आश्चर्याची गोष्ट आहे लोकांना एवढी लहानशी गोष्ट सुद्धा माहीत नाही. जर आत्मा तुम्ही जाणला नाही, जर तुम्ही आत्म्याशी संबंध केला नाही तर तुम्ही काहीही परमेश्वराबद्दल जाणू शकत नाही. जसं आपल्याला डोळे असायला पाहिजेत हा सुंदर हॉल बघायला डोळे असायला पाहिजेत, तसं आत्म्याचे जोपर्यंत डोळे उघडत नाहीत तोपर्यंत परमेश्वराशी तुमचा संबंध होऊ शकत नाही. म्हणूनच सगळे काही धर्म जे आज आपण पहातो आहे त्यांचं वाटोळं झालेलं आहे त्याला कारण आहे. उपटसुंभ लोकांनी या गोष्टींचा फायदा घेतलेला आहे. त्यांनी आपल्याला दुसर्याच मार्गाला नेलेले आहे आज ही स्थिती आलेली आहे. आपल्याच देशामध्ये नव्हे तर प्रत्येक देशात जी तरुण मंडळी आहेत त्यांचा देवावरचा विश्वास उडाला आहे. अल्जेरिया म्हणून देश आपल्याला माहिती असेल तिथे मुसलमान लोक आहेत आणि तिथे मुसलमान लोक अत्यंत धर्माध आहेत. आपल्याहीपेक्षा, फारच जास्त. आणि या धर्मांधतेमुळे त्यांची तरुण मुलं जी डॉक्टर झाली, इंजिनिअर झाली, आर्किटेक्ट झाली त्यांनी सांगितले 'हे फालतूचं आम्हाला काही नको. तुम्ही आपला त्याच्यात वेळ घालवा. पाच वेळा नमाज पढा, डोकी फोडा, नाहीतर त्या काब्याला जा, नाहीतर काही करा. पण आम्ही आता ह्याच्यात पडायला तयार नाही. फार झाल आम्हाला.' अशाच वेळेला एक मुलगा माझ्याजवळ लंडनला आला. आणि त्याला मी पार केलं. पार झाल्यावर सगळे मी त्याला समजवून सांगितलं की धर्म म्हणजे काय? मोहम्मद म्हणजे काय ? तो कुठे आपल्या उत्क्रांतीमध्ये मदत करतो. नंतर ख्रिस्त म्हणजे काय? त्याच्या पलीकडे राम, कृष्ण या सगळ्या अवतारांचा काय अर्थ आहे आणि त्याच्यानंतर तो तिथे गेल्यावर ह्या सगळ्या मुलांना एकत्र करून त्याने सांगितलं की नाही, ही गोष्ट खोटी आहे. परमेश्वर आहे. सर्वव्यापी शक्ती आहे. फक्त ह्या लोकांचं एवढंच दुखणं आहे की ह्यांच्या आत्म्याची ओळख नव्हती म्हणून हे काहीतरी आंधळ्यासारखं करत होते. पण डोळस होता येतं. आणि त्यानं पाचशे लोकांना तिथे पार केलं. आणि अशा रीतीने आमचा सहजयोग अगदी वेळेवर बसलेला आहे. जेव्हा ते लोक धर्म सोडून अविश्वासात चाललेले आहे तेव्हा मधोमध आमचा सहजयोग आहे, जिथे तुम्हाला परमेश्वराचं प्रत्यक्ष प्रमाण मिळतं. आता ही कुंडलिनी इथे स्थित आहे ह्याच्याबद्दल ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलेले आहे. तसंच सगळ्यात जास्त कार्य मार्केडेय स्वामी आणखीन आदि शंकराचार्यांनी फार मोठं कार्य केलेले आहे. त्यांनी इतकं विषद आणि सुंदर सगळे काही समजावून सांगितले आहे. मला आश्चर्य वाटतं की शंकराचार्यांची पुस्तकं कोणीच वाचत नाही. इतकंच काय मी जेव्हा कोवलमला गेले होते आणि तेव्हा ते केरळाचे रहाणारे होते. तिथे कालडी गावात त्यांचे सगळं आयुष्य गेलं होतं. आणि मला आश्चर्य वाटलं की तिथले लोक मला सांगायला लागले १२ की आम्हाला माहितीसुद्धा नाही कोण शंकराचार्य, आदि शंकराचार्य. कोणाविषयी बोलता तुम्ही? इतकं अज्ञान लोकांमध्ये इंग्रजी शिक्षणामुळे आलेले आहे. इंग्रजी शिक्षणामुळे काय काय फायदे झालेले आहेत ते तुम्ही इंग्लंडला जाऊन बघा आणि आपलं जे आपण विसरून आज बसलेले आहोत कारण आम्ही म्हणजे सेक्युलर स्टेट वगैरे झालो म्हणजे धर्माबद्दल पूर्ण अज्ञान हे सेक्युलर स्टेटचं जर लक्षण असलं तर ते आपल्यामध्ये पूर्णपणे पसरलेलं आहे. धर्म आपल्या देशामध्ये इतका गहन आणि इतकं मनन करून काढलेला आहे आणि त्याचं एक-एक लक्षण इतकं दिलेलं आहे की आपण साऱ्या संसारावर आपल्या धर्माच्या सत्यावर, सर्व संसारावर राज्य करू शकतो. प्रेमाचं राज्य करू शकतो. आणि सगळ्या जगभर आपल्याला आपल्या देशाबद्दल लोकांनाही कुथून निर्माण झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे या देशात हजारो लोक येत आहेत ते हे बघण्यासाठी की हे काय आहे सत्य ह्या देशाचं हे बघायला पाहिजे. पण त्यांच्यासाठी सुद्धा आपण भामटे काढले आहेत आणि ते भामटे त्यांना चांगलेच लुटून काढत आहेत आणि ते कधीही कोणत्याही खऱ्या ह्याच्यात जात नाही. परवा मी गावाला गेले होते, मुसळवाडीला. तर आमचे शिष्य म्हणायला लागले की माताजी, फक्त सहजयोगाच्या कृपेमुळे आमच्यात एवढी समरसता. आम्ही इतक्यादा हिंदुस्थानात येऊन गेलो पण आम्ही एकाही हिंदुस्थानी माणसाशी बोलू शकलो नाही. फक्त बोललो तर ते हे सगळे अँग्ली स्टाइल, पाश्चिमात्य पद्धतीने रहाणाऱ्या हिंदुस्थानी लोकांशी, जे अगदी इंग्लिश केंब्रिज पेक्षा चांगलं बोलतात. आणि तेलकोट शिवाय बाकी मोठे सगळे ब्रिटीश झालेले आहेत. तेव्हा मला अगदी कंटाळा आला होता या देशाचा. आणि आज ही स्थिती आलेली आहे. ते लोक तुमच्या संस्कृतीला बघून आणि तुमच्या मनन स्थितीला बघून आश्चर्यचकित होतात. आणि त्यांना वाटतं की तुमचे पाय धरावे की काय करावं. तुमच्या या प्रेमाचा सोहळा बघून त्यांना इतकं आश्चर्य वाटतं आहे की आम्ही सगळं विसरलो. त्या इंग्रजी शिक्षणामध्ये त्यांच प्रेम, त्यांचं जे काही मनाचा ओलावा असेल किंवा भक्ती, श्रद्धा जे काही असेल ते सगळं वाहन गेलेले आहे. ते आपल्याकडे झालं नाही पाहिजे. आणि होत आहे म्हणा. फार दुःखाची गोष्ट आहे. की स्वातंत्र्याच्या आधी आपण आपल्या संस्कृतीला चिकटून होतो. जसं स्वातंत्र्य मिळालं तसं आपल्याला वाटलं आता आपण मोकाट झालो. आता वाटेल तसं वागलं तरी चालेल. तसं होत नाही. कारण मानवाने जरी स्थिती गाठली नाही तर तो जनावराच्या स्थितीत तरी जाऊ शकतो का? असा मला प्रश्न पडतो. कदाचित तो राक्षसाच्या स्थितीत जाईल. कारण याच्या पुढची स्थिती म्हणजे अतिमानव होण्याची आहे. तेव्हा ते जनावराकडे कशाला जातील. आणि गेले तरी ते अशा जनावराकडे जातील जे मनुष्य ही नाही आणि जनावरही नाही. ही उत्क्रांतीची स्थिती आपल्यामध्ये पूर्णपणे घटित झालेली आहे. आणि त्या उत्क्रांतीचे एक एक स्टेज बनवलेले आहे. त्यापैकी पहिल्या स्थितीमध्ये अगदी पहिले जे चक्र आहे, आपल्यामध्ये स्थित आहे. खाली चौकोनी जे दिसतंय ह्या चक्राला मूलाधार चक्र असं म्हणतात. मूलाधार चक्र. आता ह्याच्यामध्ये सुद्धा १३ पुष्कळ लोकांनी नाना तऱ्हेच्या आपल्या कल्पना काढलेल्या आहेत. आपल्या हिंदुस्थानात कल्पकतेला काही कमतरता नाही. जो बसला तोच अध्यात्मावर बोलू लागतो कारण असं आहे त्यांना कोण धरणार? त्याच्याबद्दल काही प्रमाण नाहीच आहे. ज्याला दिसलं तोच गुरू. ज्याला दिसलं तोच आपलं लेक्चर वर लेक्चर. हजारो लोकं बसतात. मला समजत नाही हा मनुष्य बडबडतो तरी काय ? आणि लोक ऐकतात तरी काय? आणि त्याचा लाभ तरी काय? त्याचं प्रत्यक्ष तरी काय आहे ? एकच की तुमच्या खिशात पैसे किती आहेत आणि ते किती वाटले? हे मोजून घ्यावे. त्यापलीकडे त्याचं काहीही मिळत नाही. तर हे जे चक्र आहे ज्याला आपण मूलाधार चक्र असं म्हणतो. ह्या मूलाधार चक्रावरती साक्षात गणपती बसवला आहे परमेश्वराने. आता गणपती आहे की नाही. तो शास्त्रात आहे की नाही. आपल्या घरात एखादा डॉक्टर गणपती ठेवतील. पण मी जर म्हटलं की काही रोग गणपतीच्या स्तवनाने जातात. तर त्यांना अगदी आश्चर्याचा धक्का बसेल. असं कसं होईल ? त्यांना तर ते सगळे मटेरियामेडिका माहिती आहे. हा गणपती घरात जो आहे त्याने काही रोग बरे होतात असं माताजी म्हणतात म्हणजे हे काय? ह्याला काही सत्य म्हटलं पाहिजे का? पण अधिकार असला पाहिजे तुम्हाला. गणपतीशी तुमचा संबंध काय घडलेला आहे? काहीही नाही. एक आणून आपलं ठेवून कोनाड्यात ठेवला म्हणजे काही गणपती पूजा होत नाही. तोंडाची बडबड केली म्हणजे गणपती पूजा होत नाही. पण गणपती म्हणजे काय आणि तो गणपती कसा जाणायचा हे जोपर्यंत तुम्हाला त्याचा बोध होत नाही, जोपर्यंत तुम्हाला त्याचा अधिकार परमेश्वराकडून मिळत नाही तोपर्यंत तुम्ही समजू शकणार नाही की हा गणपती कोणत्या कार्यासाठी परमेश्वराने आपल्यामध्ये घातलेला आहे. आता गणपती हा पावित्र्याचं लक्षण आहे. परमेश्वराने फक्त पावित्र्य संसारात बनवलं. आणि गणपती त्याची देवता बसवली. आपल्याला आश्चर्य वाटेल आजकाल इकडं कलीयुगात बघितलं की कोणाला विश्वास नाही वाटायचा की पावित्र्य हे पहिल्यांदा परमेश्वराने संसारात बनवलं. त्याच्यानंतर कारण परमेश्वर हा पिता आणि अत्यंत दयासागर, प्रेमाचा सागर इतकंच नव्हे तर करुणेचा निधी आहे. त्याने आधी असा विचार केला की माझ्या मुलांना ज्याच्यात परम सौख्य मिळेल असं जर मला घडवायचं असेल तर पहिल्यांदा जे सगळ्यात अप्रतिम ते बसवावं आणि म्हणून त्याने संसारामध्ये फक्त पवित्रता बसवली. ही पवित्रता श्री गणेश ह्यांनी त्या मूलाधार चक्रामध्ये आपल्यातही बसवली आहे. आता गणपतीवर बोलायचे म्हटले तर मला एक लेक्चर द्यावे लागेल आणि ते फार मोठंे आहे. त्यांना वंदन करून आपण पुढे जाऊया. ह्याच्यावरचं जे चक्र आहे त्याला आम्ही स्वाधिष्ठान चक्र म्हणतो. हे सुद्धा आपल्यामध्ये परमेश्वराने बसवलेले आहे. ह्या चक्राने आपण कोणतंही कार्य करत असतो. म्हणजे कला, विचार. आता आपल्यामध्ये जे स्वाधिष्ठान चक्र आहे, त्याच्यामुळे आपण जे काही कलेचे कार्य करतो किंवा पुढचा विचार करतो किंवा जे १४ का कव ट] काही प्लॅनिंग करतो वगैरे जेवढं काही आहे त्याचा ताण त्या स्वाधिष्ठान चक्रावर पडतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मेंदूने आपण विचार करतो. ही गोष्ट खरी आहे. मेंदूने जरी आपण विचार करतो तरी त्याच्यातला जो मेद आहे, ज्याला फॅट म्हणतात तो कुठून येतो? तो आपल्या पोटामध्ये हे स्वाधिष्ठान चक्र तयार करून व्यवस्थित वर पोहचवत असतो. आता जो मनुष्य फार विचार करतो, फार प्लॅनिंग करतो, नेहमी विचारातच असतो अशा माणसाला नेहमी डायबेटिसचा रोग होऊ शकतो. कारण काय ? कारण असा मनुष्य अत्यंत विचार केल्यामुळे त्या चक्राला अत्यंत ताण देतो आणि त्या चक्राचं दुसरं कार्य असं असतं की आपलं स्प्लीन, पँक्रियाज, किडनी नंतर युट्रस, लीव्हरचा वरचा भाग ह्या सगळ्यांची देखरेख पहायची. ज्या चक्राला इतके कार्य करायचे आहे आणि त्याच्यावर जर तुम्ही एकच भार घातला तर असंतुलन जीवनात येऊन त्याला डायबेटिसचा रोग होतो. एखाद्या खेड्यातल्या माणसाला कधीही डायबेटिस होणार नाही. पण एक पांढरपेशीय १५ लोकांना किंवा जे लोक सिडेंट्री हॅबीट्स चे लोकं आहेत त्यांना बहुतेक हा होतो. त्याला कारण हे असं आहे की ते सारखे विचार करत असतात. आता प्लॅनिंग सुद्धा म्हणजे माणसाने करण्यापेक्षा जे परमेश्वराचे प्लॅनिंग आहे ते जर समजून घेतलं तर त्याला हा त्रास करायची गरज नाही की आपण बसून प्लॅनिंग करायचे. पहिल्यांदा परमेश्वराला समजून घ्या. म्हणजे त्याची जी सर्वव्यापी शक्ती आहे ती स्वत:च सगळं प्लॅनिंग करत असते. तेव्हा त्याच्या प्लॅनिंगला जर तुम्ही उतरलात तर त्याचं सर्व कार्य सुव्यवस्थित, सगळं सुंदर होईल. उलट तुम्ही जर प्लॅनिंग केलं तर त्याच्यात काही ना काही संकल्प -विकल्प करोती, आणि विकल्प येऊन सगळं प्लॅनिंग, आपल्याला दिसतंच आहे आपल्या देशाच्या प्लॅनिंगची काय स्थिती झालेली आहे ते. तेव्हा माणसाच्याकडून काही होत नाही. सगळे परमेश्वर करतो असं मी जर म्हटलं तर लोकांना वाटेल माताजी काही तरीच सांगतात. पण एकही जिवंत काम आपण करत नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल, आपण कामं काय करतो. आता दगड आहेत इथे, ते आणून इथे लावले, फरशा घातल्या आणि सांगितलं की आम्ही फार मोठे काम केले. एकही जिवंत कार्य आपण करू शकतो का? एका बी मधून एक तरी अंकुर आपण काढू शकता का? एक बी तरी आपल्याला घडवता येतं का? मग कसल्या गमजा मारायच्या. आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. काहीही तुम्ही करत नाही. सगळं मेलेलं काम आहे. अहो, हे उचलून तिकडे घाला, नाहीतर तिकडून इकडे घाला. त्याच्यात काय फरक पडणार आहे विशेष! उगीचच नसत्या उस्तापऱ्या आहेत. उलट ही असली कामे करून करून माणसाला आपण भौतिक गोष्टींची गुलामी करायला सांगितली आहे. आता समजा आमचे बिचारे हे विदेशी लोक आले आहेत. त्यांना एक त्रास होतो कधी कधी. ह्यांना खुर्चीवर बसण्याची सवय लागल्यामुळे ते खाली बसू शकत नाहीत. आता खुच्च्यांच्या डोक्यावर बसले. तर म्हटलं बरोबर खुर्च्या घेऊन फिरा आमच्याबरोबर. तुमचे कसं काय होणार हे समजत नाही मला. जमिनीवर बसायचं टाकलं. प्रत्येक अशा सवयी जडतात. ही भौतिकता इतकी वाढलेली आहे ती आपल्या डोक्यावर बसते. पण त्याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही सन्यास घ्या. मी लगेच म्हटल्याबरोबर लोकं सन्यासाला निघतात. सन्यास बिन्यास घेण्याची काही गरज नाही. व्यवस्थित लग्न करावं लग्न व्यवस्थाही परमेश्वरानेच केलेली आहे. आणि मुलंबाळे सांभाळावी. पण पावित्र्याने राहिलं पाहिजे. अशा आमच्या सहजयोगामध्ये अगदी साधारण, सर्वसामान्य जी लोकं आहेत आणि जी सर्वसामान्य पद्धतीने रहातात त्यांची व्यवस्था केलेली आहे. सन्याशाला आम्ही रियलायजेशन देऊ शकत नाही. जर कोणी मनुष्य सन्याशी बनून आमच्यासमोर येऊन उभा राहिला तर आम्ही त्यांना सांगू की हे बघा तुम्ही साधे कपडे घालून या. म्हणजे हे की जाहिराती लावून फिरायची काही गरज नाही. जो सन्यास आहे तो आपल्या आतमध्येच घडतो. अशा जाहिराती लावून बाहेर स्वत:च्या काहीतरी गमजा करणे म्हणजे खरोखर माकडाचे लक्षण आहे. माणसाने अशा भलत्या गोष्टींच्या लागू नये. आणि त्याच्यामध्ये पडू नये. हे फार चुकलेले आहे तसेच पुष्कळसे फिरतात. आणि आम्ही फार मोठे गुरू नादी गुरुसुद्धा संन्यासी बनून दाखवतात. अशा लोकांना गावाच्या वेशीबाहेर ठेवले पाहिजे. वगैरे १६ सीतेने वाल्मीकी रामायणात सांगितले आहे की कुणी संन्यासी जर दारात आला तर त्याला वेशीच्या बाहेर ठेवायचे. एकच दिवस त्याला गावाच्या वेशीवर पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्याला पिटाळलं पाहिजे. अहो, आम्ही गृहस्थ लोक आमचा तुमचा काय संबंध? तुम्ही संन्यासी आहात तर जाऊन बसा जंगलात. इथे येण्याची गरज काय ? म्हणजे दुसऱ्यांच्या पैशावर कसं जिवंत रहायचं, हे बांडगुळासारखं आयुष्य, हे पॅरासायटिक आयुष्य आणि त्याच्यासाठी आमच्या सहजयोगामध्ये मुळीच वाव नाही. जर असे तुम्ही कुणी सन्यासी असाल, दंडे संन्यासी वगैरे तर आमचा तुम्हाला नमस्कार. आम्ही तुमच्यासाठी काही करू शकत नाही. जर तुम्ही सर्वसामान्य लोकांप्रमाणे लग्न वगैरे करून व्यवस्थित म्हणजे बॅचलर्सना पण चान्स आहे. जर असे असले, तर त्यांच्यासाठी आमचा सहजयोग आहे. कारण अशा माणसाला संतुलन येतं. मुलंबाळे घरात असली, आई-वडील असले तर माणसाला संतुलन येतं. मर्यादा येतात. तो काहीतरी व्यवस्थित वागतो. ज्या माणसाला आई नाही, वडील नाही, कुणी नाही अनाथलायासारखं कुठून तरी आलेला असेल किंवा ज्याला हे माहिती नाही की मर्यादा म्हणजे कशाशी खातात ? त्या माणसाला सहजयोग कसा आम्ही द्यायचा ? कारण मर्यादेनेच बांधला जातो आणि त्यानेच त्याची प्रगती होते. तुम्ही बघितलेले आहे झाडाचं सुद्धा तसंच मनुष्य आहे. झाडाचं बी-बियाणं जेव्हा फुगतं त्याला मर्यादा घालाव्या लागतात. त्याला संगोपावं लागतं. त्याला बघावं लागतं. आजकाल सगळे मानसशास्त्रज्ञ सांगायला लागले की जिथे जिथे गृह व्यवस्था बिघडलेल्या आहेत, जिथे जिथे समाज बिघडलेला आहे तिथली मुलं अगदी बेकार जातात. आणि जे जगामध्ये आपण एवढ युद्धं इतका कलह तसच लोकांच्यामध्ये भयंकर असंतोष वगैरे बघतो त्याच्या मुळाशी त्यांची घरं तुटलेली आहेत. त्यांना आई नाही, त्यांना वडील नाहीत, ती अनाथासारखे फिरणारी मुलं आहेत. म्हणून हे असं झालेलं आहे असं निदान त्यांनी काढलेलं आहे. तेव्हा दुसरं जे चक्र आहे, ज्याला आपण स्वाधिष्ठान चक्र म्हणतो, त्याच्यावरती श्री ब्रह्मदेव आणि त्यांची शक्ती सरस्वती ही आहे. पण कुंडलिनी शक्ती जी आहे ती कुमारिका गौरी शक्ती आहे. आणि आपल्याला माहिती आहे की या गणेशाला गौरीने कसं बनवलं आणि त्याला कसं आपल्या दाराबाहेर उभं केलं ते. आता त्यावरून असं लक्षात घ्यायचं की गणेश हा गौरीचं जे पावित्र्य आहे ते बघत असतो. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रोटोकॉल ते बघत तिथे बसलेले असतात. त्यांचे छेदन होत नाही. ते त्या ठिकाणी बसून फक्त ही संगोपना करत असतात. आता जे लोक या गणेशावर आघात करतात म्हणजे गणेश हा ज्या चक्रावर बसलेला आहे त्याने पेल्व्हीक प्लेक्सस म्हणून जे प्लेक्सस आहे त्याची चालना होते. सूक्ष्मामध्ये जरी ते मूलाधार चक्र असलं तरी त्याची चालना पेल्व्हीक प्लेक्ससमुळे होते. आणि या पेल्व्हीक प्लेक्ससमुळे सेक्ससुद्धा सांभाळला जातो. तर लहान मुलाला सेक्सच काही कळत नाही म्हणून तिथे एक लहान मूल कधीही मोठं होत नाही. नेहमी जे बाल्यावस्थेत, पवित्र अवस्थेत असतं अशा गणेशाला तिथे बसवलं आहे. जे आता जी घाणेरडी मंडळी, बरीच आहेत. तुमच्या पुण्याला सुद्धा एक गृहस्थ उद्भवले आहेत. ते असं घाणेरडं १७ शिकवत असतात, की कुंडलिनी जागृत करायची असेल तर अशा घाणेरड्या पद्धतीने करायची. तर त्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे, तरी त्यांच्या लक्षात येणार नाही. त्यांना आई-बहिणी नाहीतच म्हणा. पण ही जी आई तुमची बसलेली आहे कुंडलिनी तिचं प्रोटोकॉल करणारा गणेश बसला असताना आपण अशा तऱ्हेची जी भाषा करतो कुंडलिनीला उचलायची म्हणजे आपल्या आईबरोबरच आपण काहीतरी घाणेरडा प्रकार म्हणत आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक हिंदुस्थानी आणि भारतीय माणसाला अशा गोष्टींची अत्यंत चीड आहे. आणि आपल्या देशातच अनेक लोक अशा गोष्टी करतात. आणि या तांत्रिकाने अशा घाणेरड्या गोष्टी करून आपल्या देशाला अगदी बरबाद करून टाकलंय. कोणताही मनुष्य जर आपल्या आईच्या पोटातून, उदरातून निघाला असेल आणि त्याची आई असली जगामध्ये आणि तिने पाहिलेलं असलं त्याला ही गोष्ट सहन होणार नाही. आणि ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अशा घाणेरड्यापणाच्या गोष्टी करणारे आणि पवित्र्यापासून तुम्हाला दूर नेणारे हे जे साधु-संत आपले नुसते पैसे भरत बसलेले आहेत आणि कॅडलक च्या गाड्या घेऊन फिरताहेत त्यांना उचलून लगेच समुद्रात तरी घालावं किंवा परदेशी पाठवून द्यावं. त्यांचं इथे काहीही चालू नाही दिलं पाहिजे. पण आश्चर्याची गोष्ट आहे की अशा लोकांकडे हिंदुस्थानी लोक सुद्धा जातात. मी तर असं ऐकलं आहे की काही मिनिस्टर लोकं सुद्धा तिथे जातात. म्हणजे या लोकांना तुम्ही निवडून तरी कसे देता याचं मला आश्चर्य वाटतं. आपल्या देशामध्ये आई म्हणजे काय? हे जर आपल्याला समजू नाही लागलंय, हे जर आपण विसरलो तर मात्र काहीही या देशाचं रहाणार नाही. एवढं समजलं पाहिजे की आई ही अत्यंत पवित्र व्यक्ती असते. आणि आपल्या आयुष्यात तिने आपल्याला पावित्र्य दिलेले असतं. आणि तिच्याबद्दल जे लोक असे बोलतात, ते लोक किती घातक आणि आपल्या देशाला किती नाशक आहेत, हे ओळखून राहिलं पाहिजे. आता त्याच्यावरती जे चक्र आहे त्याला आम्ही नाभी चक्र असं म्हणतो. मणिपूर चक्र असं पण त्याचं नाव आहे. आणि या नाभी चक्रावरची लक्ष्मी-नारायणाचं स्थान आहे. लक्ष्मीनारायण हे धर्म स्थापना करतात. धर्माची आपल्यामध्ये स्थापना होते. आणि लक्ष्मीचे जे सूत्र आहे, जे आपल्याला माहिती आहे ते म्हणजे आपण असा विचार करतो की या माणसाकडे लक्ष्मी आहे म्हणजे तो श्रीमंत असला पाहिजे. असा आपला अर्थ लागतो. पण लक्ष्मी आणि पैशात महदूंतर आहे. पैसा म्हणजे लक्ष्मी नाही. आणि लक्ष्मी म्हणजे पैसा नाही. एक अंग त्याचा पैसा जरी असला, त्याने समृद्धी जरी असली तरी लक्ष्मी स्वरूप वेगळें असतं. आता थोडक्यात मी लक्ष्मीबद्दल सांगते. लक्ष्मीला पाहिलेलं आहे की लक्ष्मीचा एक हात असा असतो आणि एक हात असा असतो. आणि दोन हातात तिच्या कमळं असतात. म्हणजे जो मनुष्य लक्ष्मीपती असेल त्याचं हृदय कमळासारखं असायला पाहिजे. ते गुलाबी म्हणजे त्याच्यामध्ये ओलावा असला पाहिजे. प्रेम असलं पाहिजे. तसंच त्याच्या घरामध्ये कमळासारखं सौंदर्य असलं पाहिजे. त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या वागण्यात, कपड्यात, सगळ्यामध्ये कमळासारखं सौंदर्य असायला पाहिजे. जसा एक भुंगा सुद्धा कमळामध्ये जाऊन बसू १८ शकतो. त्याचे सगळे काटे जरी बोचले तरी कमळ जसं त्याला आपलं आवरण घालून घेते आणि रात्री त्याला झाकून आरामात झोपायला मिळते. तसेच एखाद्या लक्ष्मीपतीने करायला पाहिजे. पण लक्ष्मीपती नंबरी चिडका असतो. तेव्हा अशा माणसाला आपण लक्ष्मीपती म्हणण्यापेक्षा फक्त आपण पैसेवाला म्हटलं तर ते योग्य होणार आहे. असे लक्ष्मीपती आजकाल नाहीत. पण आमच्या वेळेला म्हणजे आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे होतो, तरुण होतो, त्यावेळेला आम्ही असे पुष्कळ लोक पाहिलेले आहेत. आता तुम्ही दुर्देवी आहात त्याबाबतीत तेव्हा तुम्हाला सगळे भाडोत्री लोकच दिसतात. आमच्या वेळेला आम्ही खरोखरच काही काही फार मोठी मंडळी पाहिली होती ज्यांना खरच आम्ही लक्ष्मीपती म्हणू शकत होतो. आता दुसर्या हातामध्ये हे दान आहे. अशा माणसाच्या हातून अव्याहत दान चाललं पाहिजे. आणि या हातातून आश्रय आहे. जर आश्रयाला लोक आले तर ते आश्रयाला राहिले पाहिजेत. त्याला लक्ष्मीपती असं म्हटलं पाहिजे. तसंच लक्ष्मी ही स्वत: स्त्री स्वरूप, माता स्वरूप आहे. त्या माणसाचं स्वरूप माता स्वरूप असायला पाहिजे. असं आपल्याकडे अनेक जन्मांपूर्वी, अनंत कालापासून आपण अशी लक्ष्मीची स्थापना या देशामध्ये केलेली आहे. एवढा आपला महान देश आहे. अशी कल्पना ह्या भौतिकवादी लोकांना येणार आहे का? भोगी लोक आहेत. त्यांच्या डोक्यात येणार आहे का? एकेका पैशासाठी हे दुसऱ्यांचा गळा कापणारे लोक आहेत. त्यांच्या डोक्यात काही घुसणार आहे. हा फक्त आपल्याला एक वारसा मिळालेला आहे. तो वारसा आपण सोडायचा नाही. अभिमानाने राहिले पाहिजे. जरी आपण गरीब असलो तरी हृदयाने आपण श्रीमंत आहोत हे लक्षात असायला पाहिजे. मनुष्य गरिबी आणि श्रीमंतीने श्रीमंत होत नाही. हृदयाने श्रीमंत होतो. आता आम्हाला असं आहे की आमच्याकडे खुप श्रीमंती होती, वडिलांकडे, आणि आमचे यजमानसुद्धा फार श्रीमंत आहेत. पण आम्हाला जर तुम्ही सांगाल तर आम्ही कुठे वरती झोपायला जाऊ अगदी आरामात, नाहीतर आम्हाला रस्त्यावर म्हणता तर आम्ही तेथेदेखील झोपू शकू. कारण आम्ही अगदी मस्त आहोत. आम्हाला कशाची गरज नाही. असाच मनुष्य ज्याला कशाचीही गरज नाही तोच खरा बादशहा आहे. बाकी ज्याला गरज आहे, दुसऱ्याच्याकडे इर्षेने बघतो त्या माणसाला आपण बादशहा म्हणू शकत नाही. तेव्हा हे लक्ष्मीचं आपल्या नाभीवरती एक फार मोठ दैवत आहे. या लक्ष्मीला आपण जपलं पाहिजे. हे सौष्ठव आपल्यामध्ये सांभाळालं पाहिजे. आणि त्या सौष्ठवाला आपल्या देशात अजून लोक जपून आहेत. अजून त्यांना माहिती आहे की पैसाच म्हणजे सगळं काही नाही. त्याच्याही पलीकडे धर्म ही फार मोठी गोष्ट आहे. आणि धार्मिकतेने रहाणे म्हणजे देवळात जाऊन पोपटपंची करणं, असं मी म्हणत नाही. धार्मिकतेचा जो अर्थ आहे तो आपल्याला अनेक गुरूंनी सांगितलेला आहे. आणि अशा आपल्या या संतांच्या भूमीमध्ये अनेक गुरू आलेत आणि त्यांनी त्याबद्दल पुष्कळ चर्चा केली, की धर्म काय ? या गुरूंचे जितके उपकार मानावे तितके थोडे आहेत पण आपण त्यांची कोणतीही गोष्ट ऐकत नाही. त्यापैकी दहा मुख्य गुरू झाले आणि ते अनेकदा या संसारात आले आहेत. पैकी मोहम्मद साहेबसूद्धा दत्तात्रेयाचे साक्षात अवतरण आहे. मोहम्मद १९ साहेबांनंतरसुद्धा जे अवतरण झाले ते नानकसाहेबसुद्धा त्यांचे साक्षात अवतरण आहे. जनक सुद्धा त्यांचे अवतरण आहे. तसेच आदिनाथ वगैरे जे महावीरांचे आदि झालेले आहेत ते सुद्धा ह्यांचेच अवतरण आहे. त्यानंतर अगदी आपण फारच नशीबवान आहोत. विशेषत: अहमदनगरचे लोक की आपले इथे साईनाथ जे इथं शिर्डीला येऊन राहिले ते सुद्धा साक्षात दत्ताचेच अवतार आहेत. एकच तत्त्व जे आहे गुरूचं ते अनेकदा संसारात येतं आणि त्यांनी ज्या अनेक गोष्टी शिकवल्या त्या धर्माच्या संतुलनाबद्दल. त्यांनी रियलाझेशन वर्गैरे देण्याच्या गोष्टी नाही केल्या. आत्मज्ञान देण्याच्या फारशा गोष्टी केलेल्या नाहीत. पण जी गोष्ट त्यांनी मुख्य सांगितली आश्चर्याची सगळ्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की दारू प्यायची नाही. ते सगळे एकतर वेगळे होतील किंवा आजकालचे जे लोक दारूच्या विरूद्ध लिहितात ते तरी वेडे असतील. तर दारू प्यायची नाही त्याला कारण म्हणजे फार सायंटिफिक आहे. परवा मी केमिस्ट्रीच्या प्रोफेसरना सांगत होते की किती सायंटिफिक रिझन आहे की ज्याने दारू प्यायची नाही. दारू आणि कॅन्सर एकच तऱहेचा प्रकार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे ओएच आयर्न असतं त्या ओएच आयर्नची अशी स्थिती होऊन जाते, दारू आणि कॅन्सरमध्ये दोन्हीमध्ये एकच स्थिती होऊन जाते. तुमच्यामध्ये जी काही गरमी होते किंवा जी हीट, काम केल्यामुळे जी हीट निर्माण होते ती तुमच्या रक्तवाहिन्यातून वाहू शकत नाही. कारण त्याच्यातलं जे पाणी आहे, त्याचं जे ओएच आयर्न आहे ते शोषण करू शकत नाही. कारण त्याची पद्धती बदलते. आणि त्यामुळे संबंध गरमी तुमच्या लिव्हरमध्ये, पोटामध्ये तऱ्हेतऱ्हेच्या गरम्या एकत्र होतात. आता मी सांगायचं म्हणजे कॅन्सर हा सहजयोगाने ठीक होऊ शकतो, आणखीन कशाने होऊ शकत नाही. आणि हे आम्ही केलेले आहे. आता लंडनला आम्ही एका कॅन्सरच्या पेशंटला बरं केलेले आहे. आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या तिथल्या प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांनी आता तिथे आमचं मेडिकल कॉलेज वगैरे बरंचसं काढलेले आहे की तुम्ही आता इथे बोला वगैरे. आता बघू गेल्यावर काय होईल ते. तर त्याच्यामध्ये त्या बाईला इतकी हीट होती अंगामध्ये. सारखी हीट निघायला लागली. आणि इतकी लंडनला थंडी पडत असतांनासुद्धा तिने सगळी दारं उघडी टाकली आणि ती म्हणे की माझ्या अंगात तर इतकी हीट निघती आहे आणि सगळ्यांना वाटायला लागले की हिटर आहे. तसंच दारूङ्या माणसाचं होतं. दारूडा जो असतो, जो मनुष्य दारू पितो, त्याच्यासुद्धा लिव्हरमध्ये हीट जमा होते, मग त्याच्या किडनीमध्ये हीट जमा होते. मग त्याच्या संबंध रक्तवाहिन्या ज्या असतात त्या हार्डन होऊन जातात. आता त्यांनी सांगितलं की तुम्ही दारू पिऊ नका. आता हे मी असं म्हटलं की तुम्ही दारू पिऊ नका तर तुम्ही मुळीच ऐकणार नाही. उलट कोणी इथं येणार नाही. परवा मी जरा म्हटलं की तुम्ही शपथ घ्या की तुम्ही दारू पिणार नाही तर अर्धे लोक उठूनच गेले. अहो म्हटलं मी म्हटलं तुम्ही नुसती शपथ घ्या. मी काही म्हटलं नाही की त्याच्यासाठी तुम्हाला काही पेमेंट करावं लागेल. पण तेवढं म्हटल्याबरोबर अर्धे लोकं उठून गेले. आता दारू इतकी नुकसानाची वस्तू आहे की कुणी आई म्हणेल का की तुम्ही आपलं नुकसान करून घ्या. 'ये बाई मला मार' अशातली स्थिती आहे तुमची. ते आपले रस्त्याने ठीक २० चाललेले आहेत. त्याशिवाय झिंगलेला मनुष्य तुम्ही पाहिलेला नाही का. आता रस्त्यानेच येतांना आम्ही तीन अॅक्सीडेंट पाहिले. त्यातील एक मनुष्य दाखू पिऊन रस्त्यात असा लोळत पडलेला होता. आणि हे म्हणजे अगदी रोज आपण बघतो आहे. तरीसुद्धा लोकांनी मला सांगितलं की हिंदुस्थानात आता दारू वाढलेली आहे. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. तेव्हा ही जी आपली फार मोठी दुश्मन आहे अशी जी आपली शत्रू आहे तिला आपल्या डोक्यावर बसवून काय शहाणपण दाखवतो आहे मला समजत नाही. पण तरीही सहजयोगात आम्ही कुणाला म्हणत नाही की तुम्ही दारू सोडा. जसं आता चव्हाण साहेब म्हणाले की, 'माताजी, काही सोडायला सांगत नाहीत.' ही गोष्ट खरी आहे. आम्ही काही सांगत नाही. तुम्ही आज सोडा. किंवा आत्ता सोडा. पण पार झाल्यावर तुम्ही सोडणार. आता इथे जी मंडळी आली आहेत परदेशातून अशी तीनशे मंडळी आम्ही लंडनला फार सुंदर केलेली आहेत. त्याशिवाय हजारो लोकांनी रियलायझेशन घेतलेले आहे. पण तीनशे मंडळी फार छान आहेत. त्यातले बहुतेक दारूडे होते, ड्रग्ज घेत असत. पण ह्यांचं सगळ्यांचं सुटलं. कसं सुटलं? म्हणजे असं आहे जेव्हा आत्म्याची ओळख झाली. आत्मतत्त्वाचं स्पंदन सुरू झालं, जेव्हा आतला आनंद येऊ लागला तेव्हा मनुष्याला हे सगळे सुचतच नाही. आपोआप सगळें सुटतं. हा आनंद इतका आगळा आहे मग त्या आनंदापुढे काही सुचतच नाही. त्यानंतर हे जे काही लक्ष्मीतत्त्व आहे, त्या लक्ष्मीतत्त्वामुळे जेव्हा हे जागृत होतं तेव्हा एक मोठं कार्य घडतं आणि ते असं की तुमची सांपत्तिक स्थिती सुद्धा सुधारते. आश्चर्याची गोष्ट आहे. लोकांना आश्चर्य वाटेल की माताजी हे काय सांगताहेत. आमचं इकॉनॉमिक्स एकीकडे गेलं आणि सांपत्तिक स्थिती कशी सुधारेल. तर असं आहे की लक्ष्मीतत्त्वाने अशी सांगड बसते की त्या सांगडीमुळे सांपत्तिक स्थिती सुधारते. आता आमचे जसे हे विद्यार्थी आहेत इथून आलेले. यांना मी विचारलं ह्यांच्याजवळ पूर्वी काहीही नव्हतं अगदी भणंग भिकाऱ्यासारखे रहात होते. आणि एवढे श्रीमंत, ह्यांच्याजवळ एवढे पैसे, सगळं काही. ह्यांना काही रहाण्याची सोय नव्हती, काही नाही. मी म्हटलं की, 'ही काय तुमची रहाणी आहे. असं कसं रहाता तुम्ही?' त्याच्यानंतर मग हे माझ्याकडे आले आणि त्यांना पार झाल्यानंतर लगेच ह्यांची घरं व्यवस्थित, त्यांची रहाणी व्यवस्थित, ह्यांच्याकडे रेडिओग्राम, कधी काही, कधी काही म्हटलं हे कुठून आणायला लागले. तुमच्याजवळ पूर्वी खायलासुद्धा पैसे नसायचे. म्हणे आता दारू बंद झाली ना! तिकडे जातात अर्धे पैसे. महागाई भत्ता कशाला ? गुत्त्यात जायला. तुम्हाला काही खायला मिळत नाही अशातली गोष्ट नाही. पण त्याच्यामध्ये काही हरकत नाही तुम्ही गुत्तयात जरी गेले, पण त्यानं होतं काय ? तुमची लक्ष्मी पडते. बाटली आली की तिकडून लक्ष्मीबाई गेल्या. कोणत्याही दारूड्या माणसाचे आपण पुतळे उभे करत नाही इकडून कारण त्यांची स्थितीच नसते पुतळे उभे करण्यासारखी. आणि म्हणून दारू, सिगरेट या सर्व गोष्टींना ह्या लोकांनी मना केले होते. आणि हे फार महत्त्वाचे आहे. ह्याचे आपल्याला महत्त्व समजत नाही. फारच महत्त्वाचे आहे हे माणसाला. कारण ते चेतनेच्या विरूद्ध जातं. ज्या चेतनेने परमेश्वराला जाणायचे आहे त्या चेतनेच्या विरूद्ध ही २१ गोष्ट जाते. ती किती वाईट असेल आणि किती हानीकारक असेल हे लक्षात आणलं पाहिजे. त्याच्या वरती जे चक्र आहे त्याला हृदय चक्र असे म्हणतात. हृदय चक्र. कारण ते इथे मधे फुफ्फुसाच्या मधोमध असते. आणखीन हे फारच महत्त्वाचे आहे. कारण या चक्रावर जगदंबेचे स्थान आहे. मनुष्याला जेव्हा जेव्हा भीती वाटते तेव्हा तो आपल्या आईला आठवतो. जर त्याच्या लक्षात ही गोष्ट आली की तुझी आई ही जगन्माता आहे. अत्यंत शक्तीशालीनी आहे. वाट्टेल ते जरी झालं तरी ती तुझा बचाव करेल. आपण आता जगदंबेविषयी पुष्कळ ऐकलेले आहे पुष्कळ राक्षसांना मारून टाकले. काय काय त्यांनी केलेले आहे. तसंच एकदा फार रागावल्या होत्या त्यांनीच तांडव नृत्य सुरू केल्याबरोबर शंकराला समजेना की आता काय होणार? आई बिघडली तर काय होणार ? स्वत:च तिच्या मुलाला तिच्या पायाखाली घातल्याबरोबर अगदी अलगद आपला पाय ठेऊन एवढी मोठी जीभ त्यांनी काढलेली आहे असं आपण वाचलेले आहे. आणि सगळी गोष्ट खरी आहे. आणि त्याचं प्रत्यंतर आपल्या आयुष्यात येतं म्हणजे जेव्हा मनुष्य ज्याला सेन्स ऑफ इनसिक्युरिटी म्हणतात किंवा जेव्हा त्याला असुरक्षित असं वाटायला लागतं किंवा आता माझ्यावरती काहीतरी संकट येणार आहे, काही तरी होणार आहे असं वाटू लागतं त्यावेळेला आपलं हृदय धडधड होऊ लागतं. हृदय धडधड होण्याचे हे कारण आहे की आपले हे चक्र जे आहे ते भ्रमित होते. तिथून ती शक्ती नष्ट होते किंवा लुप्त पावते. ज्या माणसाला विशेष करून काहीतरी भूतबाधा वरगैरे अशी जी भीती वाटते की आम्हाला भूत लागले आहे, आम्ही बाहेर गेलो तर आम्हाला काहीतरी धरलंय वगैरे असे वाटत असते त्यांचीसुद्धा हीच स्थिती. जेव्हा हे चक्र रक्षित होते, जेव्हा हे चक्र आलोकित होते तेव्हा माणसाची रक्षा वाढते. आता पुष्कळ बायकांना ब्रेस्ट कॅन्सरचा आजार असतो. आता ते लोकांना असे वाटते की ब्रेस्ट कॅन्सरचा आजार म्हणजे काहीतरी दुसऱ्या कारणामुळे झालेला आहे. पण अगदी सरळ गोष्ट आहे की जर त्या बाईला असुरक्षित वाटत असेल तर तिला ब्रेस्ट कॅन्सरचा आजार होईल. तसंच आपल्याला पुष्कळांना श्वासाचा आजार असतो. आम्ही अनेक श्वासाचे रोग काढलेले आहेत आणि बरे केलेले आहेत. आपले काश्मिरचे जे गव्व्हनर, सहाय साहेब होते. भगवान सहाय साहेब, त्यांना पंचवीस वर्षाचा श्वासाचा रोग होता. तो ही पाच मिनिटात बरा केला. म्हणजे जर तुम्ही हे चक्र व्हायब्रेशन्स देऊन किंवा चैतन्य लहरी देऊन स्थित केलं तर अगदी मनुष्याला नेहमीसाठी बरं वाटतं कारण त्याचं ते चक्र ठीक झाल्याबरोबर जगदंबा जागृत होऊन त्याच्यामध्ये जी असुरक्षितपणाची भावना आहे ती नष्ट होऊन तो अगदी सुखासमाधानाने राहू लागतो. ( उर्वरित भाग पुढील अंकात) २२ ाभ र ... श्री गणेश सवप्रथम स्थाफित केलेले दैवत आहे. हे बीज आहे आणि बीजापासूनच संपूर्ण विश्व निधून परत त्याच्यातच समावले जाते. विश्वामध्ये जे काही आहे, श्री गणेश त्याचेच बीज आहे, ...२्व लोक प्रथम याठीच श्री गणेशाली प्रमुख देवता मानले जाते. श्री गणेशाचे पूजन करतीत, याचे कारण म्हणजे परमेश्वराने श्री गणेश तत्त्व स्वत पहिले या सष्टीमध्ये स्थापित केले आहे. प. पू.श्रीमाताजी, एप्रिल १९८३ प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौरसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन ०२० - २५२८६५३७, २५२८६७२०, e-mail : sale@nitl.co.in सहजयोग अशी गोष्ट आहे, अशी एक पद्धत आहे, जी परमे१्वराची आपली पद्धत आहे, ज्यामुळे आपल्या होतामधून ही व्हायब्रेशन्स वाहू लागतात, पायामधून वाहू लागतात, सर्व शरीरतून वाहू लागतात, जसे सूाचा प्रकाश आहे आणि इतरांमध्ये, त्यांच्या प्रेमामध्ये जाऊन त्यालाही ते वेग देऊ शकतील की त्याच्या आतमधूनही ते वाहू लागेल १ आणि एक प्रकारची चेन रिअॅक्शन बनवेल. प. पू.9 श्री माताजी, मुंबई, २७.३.१९७४ - ाी ---------------------- 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-0.txt चैतन्य लहरौ मराठी सप्टेंबर-ऑक्टोबर २०१२ ा। 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-1.txt प२मेश्वराच्या २्वव्यापक शक्तीशी जोडल्याशिवाय व्यक्ती अशा यंत्रासा२खा या आहे जे नी ही आपल्या सतशी जोडले गेले आहे आणि ना ही ज्याचे काही अर्थ किंवा लक्ष्य आहे. व्यक्तिमत्त्व, अंकात औताशी संबंध आल्यानंतरच संपूर्ण तंत्र कार्य करू लागते तसेच आपली अभिव्यक्ती करू लागते. प.पू.श्री माताजी, १३.९.१९९५ कुंडलिनी आणि सत चक्र ...8 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-2.txt हेट य कृपया लक्ष द्या : २०१३ च्या सर्व अंकांची नोंदणी सप्टेंबर २०१२ ला सुरू होऊन ३० नोव्हेंबर २०१२ ला समाप्त होईल. 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-3.txt कृण्डौलिनी आणि सात चक्र मतर स ाव सब मानवाला परमेश्वराने एवढ्यासाठी घडवले आहे की तो सुद्धा परमेश्वराचे एक फार मोठे साधन आहे. इतकेच नव्हे तर ते इतकं सुंदर साधन त्यांनी बनवलंय की त्या साधनाला परमेश्वर काय आहे ते कळतं. 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-4.txt २३ फेब्रुवारी १९७९ 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-5.txt अहमदनगरच्या नागरिकांनी इतक्या प्रेमाने आम्हाला निरमंत्रण पाठवलं त्याबद्दल आम्ही सर्वच आपले आभारी आहोत. त्यातूनही अहमदनगर जिल्हा म्हणजे मला विशेष वाटतो. कारण राहुरीला जे कार्य सुरू झालं आणि जे पसरत चाललं त्यावरून हे लक्षात आलं की या जिल्ह्यामध्ये काहीतरी विशेष धार्मिक कार्य पूर्वी झालेलं आहे. तसेच महाराष्ट्र हा एक आध्यात्मिक परिसर आहे. म्हणून अनेक संतांनी इथे जन्म घेऊन अनेक कार्य केलेली आहेत. सगळ्यात शेवटी सांगायचे म्हणजे साईनाथांनी आपल्याला माहिती आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये फार सुंदर कार्य केलेले आहे. ही सगळी तयारी अनादिकालापासून मानवामध्ये झालेली आहे. मनुष्य हा एक अमिबापासून वाढत वाढत आज या दिशेला पोहोचलेला आहे की तो परमेश्वराबद्दल विचार करू लागला. तो अमिबापासून या दशेला का आला? एवढी मेहनत त्याच्यावर का घेतली गेली? तो आज मानव स्थितीत येऊन तरी पूर्णत्वाला आलेला आहे की नाही? ज्यासाठी त्याला अमिबापासून त्या स्थितीला आणून सोडलेले आहे त्या स्थितीत येऊन तरी काय त्याला सगळं माहीत झालेलं आहे ? परमेश्वराबद्दल जे त्याच्यामध्ये कुतूहल आहे, काहीतरी उत्कंठा आहे, जिज्ञासा आहे. परमात्मा म्हणून कोणी तरी शक्ती संसारात आहे, असं प्रत्येक मानवाला वाटत असतं. ते त्यानं कसं जाणलं, कुठून जाणलं ? त्याबद्दल त्याने पुष्कळ पुस्तकं लिहिली आहेत, संतांची पूजा केलेली आहे. त्रास ही दिलेला आहे. अशा या मानवाला काहीतरी अर्थ असला पाहिजे. वायफळ कुणीतरी इतकी मेहनत केलेली नसणार. निदान परमेश्वराने तरी केलेली नसणार. जर समजा आम्ही हे एक यंत्र बनवलं. त्याचा आधी पाया घातला, त्याची सबंध व्यवस्था केली तर सहजच आपण विचाराल की 'माताजी, कोणासाठी ? काय आहे हे? काय बनवणं चाललंय? याच्यातून काय होणार?' हे सगळं बनवायलाच पाहिजे आधी, ही सगळी तयारी करायलाच पाहिजे. आणि सर्व तयारी झाल्यावरच जेव्हा आम्ही हे mains ला लावतो तेव्हा हे कार्यान्वित होतं. तसेच मानवाचे आहे. मानवाला परमेश्वराने एवढ्यासाठी घडवले आहे की तो सुद्धा परमेश्वराचे एक फार मोठे साधन आहे. इतकेच नव्हे तर ते इतकं सुंदर ते साधन त्यांनी बनवलंय की त्या साधनाला परमेश्वर काय आहे ते कळतं. माईकला कळत नाही, ह्याच्यातून जरी मी बोलत असले. ज्याने घडवलंय त्याला सुद्धा ते कळत नाही. याचा अवेअरनेस, जी चेतना आहे ती याच्यामध्ये नाही. ती मानवाला चेतना आधी परमेश्वराने दिली आणि मग ती आलोकित केल्यावर, enlighten केल्यावर तो हे समजू शकतो की परमेश्वराने मला का बनवलंय, आणि त्याची शक्ती त्याच्याकडून अशी अव्याहत वाहू लागते. ती जी शक्ती आहे तेच हे स्पंदन आहे. आता म्हणायला अत्यंत सोपं वाटतं, जसे चव्हाण म्हणाले ती खरी गोष्ट आहे. एका क्षणात ही गोष्ट घडते. अगदी एका क्षणात. इतकंही म्हटलं इंग्लिशमध्ये split of a second ही घटना इतकी सहजच घडली पाहिजे. कारण इतकी महत्त्वपूर्ण घटना आहे. उत्क्रांतीची ही शेवटची घटना आहे. आपण श्वास घेतो. जर तो विचार करून आणि चिकित्सा करून घ्यायला सुरुवात केली तर अर्धे लोक मुळी संपणार. जेवढ्या काही ६ 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-6.txt महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या सहज आहेत. सहज. 'सह' म्हणजे with, 'ज' म्हणजे born. सहज म्हणजे आपल्याबरोबर जन्माला आलेलं किंवा आपला जन्मसिद्ध अधिकार म्हटला तर तो योगाचा आहे. शेवटी आपण काय आहोत. हे झालंच पाहिजे. हे घडलंच पाहिजे. पुष्कळांना मी म्हटलं की काही याच्यात मेहनत नाही केली तरच बरं. तर त्यांना आश्चर्य वाटतं माताजी असं कसं म्हणतात! पण आपण मेहनत करून परमेश्वराला बोलावू शकतो का? एखाद्या थेंबाने म्हटलं की मी मेहनत करून सबंध सागराला माझ्याकडे बोलावून घेईन. तर शक्य आहे हे? सागरालाच उतरायला पाहिजे त्या थेंबाला आपल्यामध्ये घेण्यासाठी. तसेच आहे हे. जर आपण काही म्हटलं आम्ही मेहनत करू, डोक्यावर उभे राहू किंवा आम्ही काही कसली तरी धावपळ करू, तर त्याने परमेश्वर मिळणार नाही. अशा प्रयत्नाने मिळणार नाही. पण जर तुम्ही स्थिरावलेले आहात, धार्मिक आहात आणि मध्य मार्गावर बसलेले आहात, अतिशय नाही कशामध्ये. अशा लोकांना ही घटना सहज झालीच पाहिजे. जसं झाडाला एक फळं लागतं. आधी एखादंच फळ लागतं जेव्हा झाड लहान असतं, नंतर दोन-चार आणखीन फळें येतात, पण शेवटी बहर येतो, आणि अनेक फुलांची फळे बनतात. तसेच आज विशेष वेळ आलेली आहे. हे कलियुगात घडायचे होते, घडत आहे आणि घडेल त्याबद्दल एवढा उहापोह कशाला असतो ते मला आजपर्यंत कधीच लक्षात आलेले नाही की असं का? तसं का? याबद्दल मला फार आश्चर्य वाटतं. अहो, उद्या जर मी म्हटलं इथे हिरा आहे, तर तुम्ही विचार कराल का? आधी धावत पळत घेऊन याल ना! मग सर्व जे जन्मजन्मांतराचे मिळवलेले आहे ते सहजयोगाने तुम्हाला जर प्राप्त होतं असं मी जर तुम्हाला म्हणते तर त्यात उहापोह कशाला करायचा? ही घटना घडविण्यासाठी अनेक अवतार संसारात आले त्यांनी तुमची सगळी काही तयारी केलेली आहे. ती कशी काय केलेली आहे. ते इथे मी दाखवलेले आहे. ते आपण बघावं म्हणजे आपल्याला थोडंसं समजावून सांगते. जे काही बाहेर हे शरीर दिसतं आहे हे कशाच्या दमावर आहे ? डॉक्टरांना जर विचारलं की काहो, पॅरासिम्पथॅटिक नव्व्हस सिस्टम म्हणजे काय आहे? तर ते म्हणतील की ही ऑटोनॉमस नव्व्हस सिस्टम आहे म्हणजेच स्वयंचलित आहे. पण हे स्वयं म्हणजे कोण? ते आम्हाला माहिती नाही. निदान या बाबतीत प्रामाणिक आहेत की आम्हाला ते माहीत नाही की ती कशी चालते? कशी कार्यान्वित असते ? ते आम्हाला माहिती नाही. म्हणजे आपण जेवल्याबरोबर आपलं अन्न कोण पचन करतं? आपला श्वासोच्छवास असा बरोबर कसा चालू असतो? त्यातूनही जर समजा तुम्ही धावत सुटले तर तुमच्या हृदयाची क्रिया वाढेल आणि हृदय धडधडू लागेल. ते तुम्ही करू शकता, पण ते हळू करण्याचे काम कोण करतं ? ही क्रिया कोण साधून घेतं ? असं जर तुम्ही डॉक्टरांना विचारलं तर ते सांगू शकत नाही. ते म्हणतील ते आमच्या सायन्सच्या पलीकडचं आहे. तसंच मानसशास्त्रात सुद्धा पुष्कळ लोकांनी प्रयोग करून पाहिलं आहे आणि असं सिद्ध केलं आहे की अशी कोणती तरी शक्ती आहे जी ऑल परवेदिंग आहे, सर्वव्यापी आहे. तिला ते ७ 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-7.txt युनिव्हर्सल अनकॉन्शस म्हणतात आणि ती स्वप्नात येऊन तुमचं मार्गदर्शन करत असते आणि त्याच्यामध्ये काही प्रतीकरूपाने मार्गदर्शन येत असतं. एक प्रकारचा जर त्रिकोण दिसत असला तर तो इथं दिसो किंवा ऑस्ट्रेलियात दिसो किंवा अमेरिकेत दिसो त्याला एकच अर्थ असतो. पण ते सुद्धा एका स्थितीत पोहचून असेच म्हणतात की ह्याचे आम्ही काही सांगू शकत नाही. हे आम्ही जे बाहेरून आहे असेच दिसते. पण आतून कसं येत आहे आणि कसं कार्यान्वित होतं आहे ते आपल्याला दिसत नाही. आपला भारत हा फार मोठा देश आहे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की हा खरोखरच हा एक फार मोठा देश आहे कारण की ही एक योग भूमी आहे. इथल्या लोकांनी कधीही जास्त प्रपंच किंवा भौतिक गोष्टींकडे लक्ष दिले नाही. त्यांनी नेहमी या गोष्टींचा विचार केलेला आहे की मनुष्य हा संसारात का आला ? कसा आला? कुठून आला? त्याचा अर्थ काय आहे? आणि मनन करून, मेहनत करून तुमच्या पूर्वजांनी ही कमाई करून ठेवलेली आहे आणि याचा पत्ता लावून ठेवलेला आहे. फक्त फरक एवढाच आहे की ते कार्यान्वित झालं नव्हतं आणि ते आमच्या हातून आज घडत आहे. जसं की आज आपण ही वीज बघता. या वीजेला केवढा मोठा इतिहास आहे. वर्षानुवर्ष याच्यावर मेहनत केल्यावर मग एकाने याचा पत्ता लावला की अशा रीतीने वीज होते. समजा, जर त्याने पत्ता लावून आपल्यापुरतेच ठेवले असते किंवा दोन-चार लोकांना दिले असते तर आज तुम्ही मान्य केले असते का एडिसन एवढा मोठा मनुष्य होता. न्युटन एवढा मोठा मनुष्य होता. प्रत्येक भौतिकात सुद्धा सापडलेला शोध हा जनसाधारणाला मिळालाच पाहिजे. तसेच हे सुद्धा अध्यात्मातलं सगळ्यांना मिळालंच पाहिजे नाहीतर कुणाला विश्वास वाटणार नाही. तसेच जर आपण पाहिले तर एका अमिबापासून माणसं झालेले आहोत असं म्हणतात आणि ती गोष्ट खरी आहे. तेंव्हा सुद्धा सगळे अमिबा काही माणसं झालेली नाहीत. सगळ्या मासळ्या काही रेपटाईल झालेल्या नाहीत आणि सगळे रेपटाईल काही त्याच्या वरच्या वर्गाला गेले नाहीत. त्याच्यातही चयन होत असतं आणि त्या चयनाने उत्क्रांती होता होता आज आपण मानव स्थितीला आलो. जर ह्याच्यावरची कोणती स्थिती असेल इथे आपल्याला पोहोचायचे आहे. ज्याच्याबद्दल पुष्कळांनी इशारे केलेले आहेत आणि वर्णन केलेले आहे अशी जर कोणती स्थिती असेल तिथे सुद्धा थोडे बहुत चयन व्हायलाच पाहिजे आणि असं चयन होतं. सहजयोगामध्ये दहा माणसं आली तर कदाचित दोन लोकांना होत नाही. आता आम्ही कोवलमला होतो. तिथे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आमचा प्रोग्राम केला. म्हणजे पहिल्यांदाच गव्हर्नमेंटला काहीतरी सुज्ञपणा आलेला दिसतो. त्यांनी आमचा प्रोग्राम कोवलममध्ये केला होता. तिथे पत्रकार लोक आले होते. आता पत्रकार म्हणजे आपल्याला माहिती आहे की कोणत्या दर्जाचे असतात. काही-काही तर फारच अगदी विचित्र प्रकारचे असतात आणि आल्याबरोबर त्यांनी आम्हाला दारूबिरू द्या, नाहीतर आम्ही काही प्रोग्रामला येत नाही. आमची एवढी फी ठरलेली आहे. एक-एक ८ 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-8.txt बाटली दिली तरी वगैरे वरगैरे, असे प्रकार सुरू केल्यावर मी सरळ सांगितलं की माझं काही छापायला नको तुम्ही. तुम्ही चालते व्हा इथून. आम्हाला मुळीच नको आहे तुमचं काही. त्याच्यावर ते रागावले आणि भलतं सलतं सहजयोगाबद्दल सुद्धा दोन-चार लोकांनी लिहिलंय. पण त्यातल्या त्यात काही लोकांना मी पार करून टाकलं. त्यामुळे काही लोकांनी चांगलं लिहिलं. काहींनी वाईट लिहिलं. जरी तुम्ही चांगलं वाईट काही लिहिले तरी सत्याला कधीही मागं घेता येत नाही कारण सत्य हे सत्यावरच उभे आहे तेव्हा तुम्ही जरी तुमच्या एकंदर शुद्रतेमुळे किंवा एखाद्या मूर्खपणामुळे तुम्ही काही चूक लिहिलं तरी सत्य हे सत्यच आहे. तेव्हा दहापैकी जर आठ माणसं पार होतात तेव्हा ही गोष्ट खरोखर आहे आणि झाली पाहिजे. आणि त्याचं प्रमाण आपल्याला अनेक दृष्टीने पहाता येते. आधी मी आपल्याला सांगते की काय आहे कुंडलिनी वगैरे आणि त्याचं प्रमाण कसं ओळखायचं ते पण तुम्हाला सांगते. जसं आता आपण माझं बोलणं ऐकत आहात, जे काही मी बोलत आहे ते आपल्या मनामध्ये येतं, ते आपण माझं ऐकता आणि ते सगळे आपलं जे गत आहे तिथे जाऊन बसतं. अशा रीतीने ही डावी कडची जी बाजू आहे ती इडा नाडी मानली जाते. तिला चंद्र नाडी सुद्धा म्हणतात आणि हठयोगात तिला 'था' नाडी म्हणतात. ही परमेश्वराची शक्ती आहे, ज्या शक्तीमुळे आपले अस्तित्व बनलेले आहे. अस्तित्व शक्ती आहे ही आणि हे जर आपल्याला पटत असेल तर मी असं म्हणेन की ही शिवाची शक्ती आहे. आणि हिला संस्कृत भाषेमध्ये महाकालीची शक्ती असं म्हणतात. महाकालीची शक्ती आहे. आता डॉक्टर लोक म्हणतील की आमचे येथे काही महाकाली नाही आहे. तर आपलं संस्कृत हे इंग्लिश भाषा येण्याच्या हजारो वर्षापूर्वी लिहिलं गेलं होतं. आणि ह्या गोष्टींचा त्याच्याही आधी हजारो वर्ष आधी पत्ता लागला होता. तेव्हा इंग्लिश लोकांनी आपली चिकित्सा करावी अशी त्यांची अजून लायकी आलेली नाही. डावीकडची जी इडा नाही आहे, ह्या नाडीमुळे आपल्या अस्तित्वाला सुरुवात झालेली आहे. आपलं अस्तित्व यावर अवलंबून असते आणि आपलं अस्तित्व नसतं तेव्हा आपण नष्ट होतो म्हणून पुष्कळदा याला डिस्ट्रॉयिंग शक्ती सुद्धा म्हणतात. नंतर ही जी उजवीकडे आपली शक्ती कार्यान्वित आहे, जी उजवीकडे आहे, ती वर जाऊन डावीकडे जाते आणि ही वर जाऊन उजवीकडे जाते. तर ही उजवीकडची शक्ती आहे त्या शक्तीने आपण आपली शारीरिक स्थिती, शारीरिक कार्य हे करत असतो आणि ह्या स्थितीने आपण आपलं बौद्धिक कार्य करत असतो. म्हणजे पुढचं प्लॅनिंग करायचे असले, पुढचा विचार असला की ज्याला आपण म्हणतो की आता आम्हाला हे आरगनाइझ करायचे आहे, आम्हाला हे व्यवस्थित करायचे आहे किंवा घरात बायका सुद्धा उद्या पापड करायचे की चटण्या करायच्या वर्गैरे वर्गैरे असे जे काही आपल्याला पुढचे विचार येत असतात, ज्याला आपण म्हणू आपल्या भविष्याचे जे काही आपण विचार किंवा त्याचे जे काही प्लॅन करत असतो ते सगळे या शक्तीने आपल्यामध्ये कार्यान्वित होतात. तसंच आपल्या शरीराचे कार्य म्हणजे आपण जर असं ठरवलं की उद्या आपण धावायला जायचं. तर जे आपण धावायला लागतो किंवा आपल्या शरीराची जी काही ९ 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-9.txt 1र ा॥ गती होते ती सुद्धा खालच्या बाजूने होत असते म्हणजे खालची बाजू जी आहे ती त्या गतीसाठी असते. त्याला आपण असं म्हणू मेंटल अँड फिजीकल एक्झिस्टंस, जे काही आहे ते किंवा त्याचं जे काही कार्य आहे त्या कार्यासाठी उपयोगात येते. आता मधोमध जी शक्ती आहे त्या शक्तीला सुषुम्ना नाडी असं म्हणतात. सुषुम्ना नाडीतून ही शक्ती वहात असते. परमेश्वराची कार्यशक्ती जी आहे ती आपण पाहिली. उजव्या बाजूला जी पिंगला नाडी आहे त्याच्यातून कार्यान्वित होत असते आणि मधोमध जी सुषुम्ना नाडी आहे त्याच्यामुळेच उत्क्रांती झाली आहे. १० 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-10.txt त्याच्यामुळेच आपल्यामध्ये धर्म स्थापन होतो. म्हणजे आता कार्बनला चार व्हेलन्सी असतात. आपल्यामध्ये जर केमिस्ट्रीचे प्रोफेसर असले तर त्यांना माहिती आहे की पिरिऑडिक लॉ मध्ये सबंध अगदी व्यवस्थित बसवलेले आहे सगळं. हे पाहिलं की आश्चर्य वाटतं की कुणी प्लॅनिंग केलं असेल आणि कसे एक- एक बरोबर सगळे एलिमेंट्स त्यांनी बसवलेले आहेत. तर कार्बनला जसं चार व्हेलन्सी आहेत किंवा सोनं आहे, सोन्याचा रंग जसा कधी खराब होत नाही. हा त्याचा धर्म आहे. तसाच मानवाचा धर्म याच सुषुम्ना नाडी मुळे बनतो. पहिल्यांदा ह्याच्यात धर्म बनतो आणि त्यानंतर त्याची उत्क्रांती होते. धर्म बदलत बदलत उत्क्रांती होते. आपल्या धर्मात आणि सोन्याच्या धर्मामध्ये फरक आहे. आपल्या धर्मात आणि एका प्राण्याच्या धर्मात फरक आहे. पण आता मानव धर्म बनल्यावरती त्याची पुढची स्थिती काय? ती धर्मातीत आहे. ती गुणातीत आहे. म्हणजे हे जे तीन गुण मी आता आपल्याला सांगितले आहेत, ते तमोगुण, रजोगुण आणि सत्त्वगुण मध्ये आहे. त्या गुणापलीकडे सुद्धा आपण जातो. ह्या मनुष्याच्या सीमित आल्यानंतरच की आता अशा स्थितीला आल्यानंतर की जिथे फक्त त्याला त्याचा मनुष्य अर्थ कळला पाहिजे. त्याला त्याच्या सर्वव्यापी शक्तीशी संबंधित केलं पाहिजे. आणि त्यासाठी जी आपल्यामध्ये शक्ती खाली स्थित आहे तिला कुंडलिनी असं म्हणतात. ही कुंडलिनी साडे तीन वेटोळे घालून त्याच्यात बसलेली आहे. पण ही एका टेपरेकॉर्डरमध्ये जसा टेप असतो तशी आपल्यामध्ये स्थित असते आणि आपल्यामध्ये जे काही गत असेल, जे काही पाप , पुण्य, जे काही आपण केलेले असेल ते सगळं त्याच्यात असतं, म्हणजे याच जन्मातलं नाही तर अनेक जन्मातलं सगळं काही त्यामध्ये विहीत असते. अशी ती कुंडलिनी आपल्यामध्ये खाली स्थित असते. जसं एखाद्या बी मध्ये त्याचा अंकुर असतो तसेच मानवामध्ये हा अंकुर, ही तुमची आई जन्मजन्मांतर तुमच्याबरोबर जन्माला येते आणि सगळें काही तुमचं जे असतं ते बघत असते आणि त्यावेळेची वाट बघत असते की जेव्हा हे कार्य घडेल आणि तुम्हाला पुनर्जन्म मिळेल. आता पूर्वीच्या काळी एक-दोन लोकांना असं झालं, पुष्कळसे लोक आपल्याला माहिती आहेत, असं आपण ऐकलेले नाही की पुष्कळसे लोक एकदम साधू झाले किंवा त्यांना परमेश्वराचा बोध झाला. ज्ञान मात्र लोकांना आहे. म्हणजे आपण ज्ञानेश्वरी वाचली, गीता वाचली, ११ 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-11.txt इकडे गेलो पण बोध मात्र फार कमी लोकांना होतो. आणि त्यामुळेच सगळे घोटाळे उभे झालेले आहेत. सांगायचं म्हणजे कोणताही धर्म, कोणताही अध्यात्म करायचा म्हणजे पहिली गोष्ट आहे तुमच्या आत्म्याशी संबंध जोडलाच पाहिजे. आश्चर्याची गोष्ट आहे लोकांना एवढी लहानशी गोष्ट सुद्धा माहीत नाही. जर आत्मा तुम्ही जाणला नाही, जर तुम्ही आत्म्याशी संबंध केला नाही तर तुम्ही काहीही परमेश्वराबद्दल जाणू शकत नाही. जसं आपल्याला डोळे असायला पाहिजेत हा सुंदर हॉल बघायला डोळे असायला पाहिजेत, तसं आत्म्याचे जोपर्यंत डोळे उघडत नाहीत तोपर्यंत परमेश्वराशी तुमचा संबंध होऊ शकत नाही. म्हणूनच सगळे काही धर्म जे आज आपण पहातो आहे त्यांचं वाटोळं झालेलं आहे त्याला कारण आहे. उपटसुंभ लोकांनी या गोष्टींचा फायदा घेतलेला आहे. त्यांनी आपल्याला दुसर्याच मार्गाला नेलेले आहे आज ही स्थिती आलेली आहे. आपल्याच देशामध्ये नव्हे तर प्रत्येक देशात जी तरुण मंडळी आहेत त्यांचा देवावरचा विश्वास उडाला आहे. अल्जेरिया म्हणून देश आपल्याला माहिती असेल तिथे मुसलमान लोक आहेत आणि तिथे मुसलमान लोक अत्यंत धर्माध आहेत. आपल्याहीपेक्षा, फारच जास्त. आणि या धर्मांधतेमुळे त्यांची तरुण मुलं जी डॉक्टर झाली, इंजिनिअर झाली, आर्किटेक्ट झाली त्यांनी सांगितले 'हे फालतूचं आम्हाला काही नको. तुम्ही आपला त्याच्यात वेळ घालवा. पाच वेळा नमाज पढा, डोकी फोडा, नाहीतर त्या काब्याला जा, नाहीतर काही करा. पण आम्ही आता ह्याच्यात पडायला तयार नाही. फार झाल आम्हाला.' अशाच वेळेला एक मुलगा माझ्याजवळ लंडनला आला. आणि त्याला मी पार केलं. पार झाल्यावर सगळे मी त्याला समजवून सांगितलं की धर्म म्हणजे काय? मोहम्मद म्हणजे काय ? तो कुठे आपल्या उत्क्रांतीमध्ये मदत करतो. नंतर ख्रिस्त म्हणजे काय? त्याच्या पलीकडे राम, कृष्ण या सगळ्या अवतारांचा काय अर्थ आहे आणि त्याच्यानंतर तो तिथे गेल्यावर ह्या सगळ्या मुलांना एकत्र करून त्याने सांगितलं की नाही, ही गोष्ट खोटी आहे. परमेश्वर आहे. सर्वव्यापी शक्ती आहे. फक्त ह्या लोकांचं एवढंच दुखणं आहे की ह्यांच्या आत्म्याची ओळख नव्हती म्हणून हे काहीतरी आंधळ्यासारखं करत होते. पण डोळस होता येतं. आणि त्यानं पाचशे लोकांना तिथे पार केलं. आणि अशा रीतीने आमचा सहजयोग अगदी वेळेवर बसलेला आहे. जेव्हा ते लोक धर्म सोडून अविश्वासात चाललेले आहे तेव्हा मधोमध आमचा सहजयोग आहे, जिथे तुम्हाला परमेश्वराचं प्रत्यक्ष प्रमाण मिळतं. आता ही कुंडलिनी इथे स्थित आहे ह्याच्याबद्दल ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलेले आहे. तसंच सगळ्यात जास्त कार्य मार्केडेय स्वामी आणखीन आदि शंकराचार्यांनी फार मोठं कार्य केलेले आहे. त्यांनी इतकं विषद आणि सुंदर सगळे काही समजावून सांगितले आहे. मला आश्चर्य वाटतं की शंकराचार्यांची पुस्तकं कोणीच वाचत नाही. इतकंच काय मी जेव्हा कोवलमला गेले होते आणि तेव्हा ते केरळाचे रहाणारे होते. तिथे कालडी गावात त्यांचे सगळं आयुष्य गेलं होतं. आणि मला आश्चर्य वाटलं की तिथले लोक मला सांगायला लागले १२ 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-12.txt की आम्हाला माहितीसुद्धा नाही कोण शंकराचार्य, आदि शंकराचार्य. कोणाविषयी बोलता तुम्ही? इतकं अज्ञान लोकांमध्ये इंग्रजी शिक्षणामुळे आलेले आहे. इंग्रजी शिक्षणामुळे काय काय फायदे झालेले आहेत ते तुम्ही इंग्लंडला जाऊन बघा आणि आपलं जे आपण विसरून आज बसलेले आहोत कारण आम्ही म्हणजे सेक्युलर स्टेट वगैरे झालो म्हणजे धर्माबद्दल पूर्ण अज्ञान हे सेक्युलर स्टेटचं जर लक्षण असलं तर ते आपल्यामध्ये पूर्णपणे पसरलेलं आहे. धर्म आपल्या देशामध्ये इतका गहन आणि इतकं मनन करून काढलेला आहे आणि त्याचं एक-एक लक्षण इतकं दिलेलं आहे की आपण साऱ्या संसारावर आपल्या धर्माच्या सत्यावर, सर्व संसारावर राज्य करू शकतो. प्रेमाचं राज्य करू शकतो. आणि सगळ्या जगभर आपल्याला आपल्या देशाबद्दल लोकांनाही कुथून निर्माण झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे या देशात हजारो लोक येत आहेत ते हे बघण्यासाठी की हे काय आहे सत्य ह्या देशाचं हे बघायला पाहिजे. पण त्यांच्यासाठी सुद्धा आपण भामटे काढले आहेत आणि ते भामटे त्यांना चांगलेच लुटून काढत आहेत आणि ते कधीही कोणत्याही खऱ्या ह्याच्यात जात नाही. परवा मी गावाला गेले होते, मुसळवाडीला. तर आमचे शिष्य म्हणायला लागले की माताजी, फक्त सहजयोगाच्या कृपेमुळे आमच्यात एवढी समरसता. आम्ही इतक्यादा हिंदुस्थानात येऊन गेलो पण आम्ही एकाही हिंदुस्थानी माणसाशी बोलू शकलो नाही. फक्त बोललो तर ते हे सगळे अँग्ली स्टाइल, पाश्चिमात्य पद्धतीने रहाणाऱ्या हिंदुस्थानी लोकांशी, जे अगदी इंग्लिश केंब्रिज पेक्षा चांगलं बोलतात. आणि तेलकोट शिवाय बाकी मोठे सगळे ब्रिटीश झालेले आहेत. तेव्हा मला अगदी कंटाळा आला होता या देशाचा. आणि आज ही स्थिती आलेली आहे. ते लोक तुमच्या संस्कृतीला बघून आणि तुमच्या मनन स्थितीला बघून आश्चर्यचकित होतात. आणि त्यांना वाटतं की तुमचे पाय धरावे की काय करावं. तुमच्या या प्रेमाचा सोहळा बघून त्यांना इतकं आश्चर्य वाटतं आहे की आम्ही सगळं विसरलो. त्या इंग्रजी शिक्षणामध्ये त्यांच प्रेम, त्यांचं जे काही मनाचा ओलावा असेल किंवा भक्ती, श्रद्धा जे काही असेल ते सगळं वाहन गेलेले आहे. ते आपल्याकडे झालं नाही पाहिजे. आणि होत आहे म्हणा. फार दुःखाची गोष्ट आहे. की स्वातंत्र्याच्या आधी आपण आपल्या संस्कृतीला चिकटून होतो. जसं स्वातंत्र्य मिळालं तसं आपल्याला वाटलं आता आपण मोकाट झालो. आता वाटेल तसं वागलं तरी चालेल. तसं होत नाही. कारण मानवाने जरी स्थिती गाठली नाही तर तो जनावराच्या स्थितीत तरी जाऊ शकतो का? असा मला प्रश्न पडतो. कदाचित तो राक्षसाच्या स्थितीत जाईल. कारण याच्या पुढची स्थिती म्हणजे अतिमानव होण्याची आहे. तेव्हा ते जनावराकडे कशाला जातील. आणि गेले तरी ते अशा जनावराकडे जातील जे मनुष्य ही नाही आणि जनावरही नाही. ही उत्क्रांतीची स्थिती आपल्यामध्ये पूर्णपणे घटित झालेली आहे. आणि त्या उत्क्रांतीचे एक एक स्टेज बनवलेले आहे. त्यापैकी पहिल्या स्थितीमध्ये अगदी पहिले जे चक्र आहे, आपल्यामध्ये स्थित आहे. खाली चौकोनी जे दिसतंय ह्या चक्राला मूलाधार चक्र असं म्हणतात. मूलाधार चक्र. आता ह्याच्यामध्ये सुद्धा १३ 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-13.txt पुष्कळ लोकांनी नाना तऱ्हेच्या आपल्या कल्पना काढलेल्या आहेत. आपल्या हिंदुस्थानात कल्पकतेला काही कमतरता नाही. जो बसला तोच अध्यात्मावर बोलू लागतो कारण असं आहे त्यांना कोण धरणार? त्याच्याबद्दल काही प्रमाण नाहीच आहे. ज्याला दिसलं तोच गुरू. ज्याला दिसलं तोच आपलं लेक्चर वर लेक्चर. हजारो लोकं बसतात. मला समजत नाही हा मनुष्य बडबडतो तरी काय ? आणि लोक ऐकतात तरी काय? आणि त्याचा लाभ तरी काय? त्याचं प्रत्यक्ष तरी काय आहे ? एकच की तुमच्या खिशात पैसे किती आहेत आणि ते किती वाटले? हे मोजून घ्यावे. त्यापलीकडे त्याचं काहीही मिळत नाही. तर हे जे चक्र आहे ज्याला आपण मूलाधार चक्र असं म्हणतो. ह्या मूलाधार चक्रावरती साक्षात गणपती बसवला आहे परमेश्वराने. आता गणपती आहे की नाही. तो शास्त्रात आहे की नाही. आपल्या घरात एखादा डॉक्टर गणपती ठेवतील. पण मी जर म्हटलं की काही रोग गणपतीच्या स्तवनाने जातात. तर त्यांना अगदी आश्चर्याचा धक्का बसेल. असं कसं होईल ? त्यांना तर ते सगळे मटेरियामेडिका माहिती आहे. हा गणपती घरात जो आहे त्याने काही रोग बरे होतात असं माताजी म्हणतात म्हणजे हे काय? ह्याला काही सत्य म्हटलं पाहिजे का? पण अधिकार असला पाहिजे तुम्हाला. गणपतीशी तुमचा संबंध काय घडलेला आहे? काहीही नाही. एक आणून आपलं ठेवून कोनाड्यात ठेवला म्हणजे काही गणपती पूजा होत नाही. तोंडाची बडबड केली म्हणजे गणपती पूजा होत नाही. पण गणपती म्हणजे काय आणि तो गणपती कसा जाणायचा हे जोपर्यंत तुम्हाला त्याचा बोध होत नाही, जोपर्यंत तुम्हाला त्याचा अधिकार परमेश्वराकडून मिळत नाही तोपर्यंत तुम्ही समजू शकणार नाही की हा गणपती कोणत्या कार्यासाठी परमेश्वराने आपल्यामध्ये घातलेला आहे. आता गणपती हा पावित्र्याचं लक्षण आहे. परमेश्वराने फक्त पावित्र्य संसारात बनवलं. आणि गणपती त्याची देवता बसवली. आपल्याला आश्चर्य वाटेल आजकाल इकडं कलीयुगात बघितलं की कोणाला विश्वास नाही वाटायचा की पावित्र्य हे पहिल्यांदा परमेश्वराने संसारात बनवलं. त्याच्यानंतर कारण परमेश्वर हा पिता आणि अत्यंत दयासागर, प्रेमाचा सागर इतकंच नव्हे तर करुणेचा निधी आहे. त्याने आधी असा विचार केला की माझ्या मुलांना ज्याच्यात परम सौख्य मिळेल असं जर मला घडवायचं असेल तर पहिल्यांदा जे सगळ्यात अप्रतिम ते बसवावं आणि म्हणून त्याने संसारामध्ये फक्त पवित्रता बसवली. ही पवित्रता श्री गणेश ह्यांनी त्या मूलाधार चक्रामध्ये आपल्यातही बसवली आहे. आता गणपतीवर बोलायचे म्हटले तर मला एक लेक्चर द्यावे लागेल आणि ते फार मोठंे आहे. त्यांना वंदन करून आपण पुढे जाऊया. ह्याच्यावरचं जे चक्र आहे त्याला आम्ही स्वाधिष्ठान चक्र म्हणतो. हे सुद्धा आपल्यामध्ये परमेश्वराने बसवलेले आहे. ह्या चक्राने आपण कोणतंही कार्य करत असतो. म्हणजे कला, विचार. आता आपल्यामध्ये जे स्वाधिष्ठान चक्र आहे, त्याच्यामुळे आपण जे काही कलेचे कार्य करतो किंवा पुढचा विचार करतो किंवा जे १४ का 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-14.txt कव ट] काही प्लॅनिंग करतो वगैरे जेवढं काही आहे त्याचा ताण त्या स्वाधिष्ठान चक्रावर पडतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मेंदूने आपण विचार करतो. ही गोष्ट खरी आहे. मेंदूने जरी आपण विचार करतो तरी त्याच्यातला जो मेद आहे, ज्याला फॅट म्हणतात तो कुठून येतो? तो आपल्या पोटामध्ये हे स्वाधिष्ठान चक्र तयार करून व्यवस्थित वर पोहचवत असतो. आता जो मनुष्य फार विचार करतो, फार प्लॅनिंग करतो, नेहमी विचारातच असतो अशा माणसाला नेहमी डायबेटिसचा रोग होऊ शकतो. कारण काय ? कारण असा मनुष्य अत्यंत विचार केल्यामुळे त्या चक्राला अत्यंत ताण देतो आणि त्या चक्राचं दुसरं कार्य असं असतं की आपलं स्प्लीन, पँक्रियाज, किडनी नंतर युट्रस, लीव्हरचा वरचा भाग ह्या सगळ्यांची देखरेख पहायची. ज्या चक्राला इतके कार्य करायचे आहे आणि त्याच्यावर जर तुम्ही एकच भार घातला तर असंतुलन जीवनात येऊन त्याला डायबेटिसचा रोग होतो. एखाद्या खेड्यातल्या माणसाला कधीही डायबेटिस होणार नाही. पण एक पांढरपेशीय १५ 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-15.txt लोकांना किंवा जे लोक सिडेंट्री हॅबीट्स चे लोकं आहेत त्यांना बहुतेक हा होतो. त्याला कारण हे असं आहे की ते सारखे विचार करत असतात. आता प्लॅनिंग सुद्धा म्हणजे माणसाने करण्यापेक्षा जे परमेश्वराचे प्लॅनिंग आहे ते जर समजून घेतलं तर त्याला हा त्रास करायची गरज नाही की आपण बसून प्लॅनिंग करायचे. पहिल्यांदा परमेश्वराला समजून घ्या. म्हणजे त्याची जी सर्वव्यापी शक्ती आहे ती स्वत:च सगळं प्लॅनिंग करत असते. तेव्हा त्याच्या प्लॅनिंगला जर तुम्ही उतरलात तर त्याचं सर्व कार्य सुव्यवस्थित, सगळं सुंदर होईल. उलट तुम्ही जर प्लॅनिंग केलं तर त्याच्यात काही ना काही संकल्प -विकल्प करोती, आणि विकल्प येऊन सगळं प्लॅनिंग, आपल्याला दिसतंच आहे आपल्या देशाच्या प्लॅनिंगची काय स्थिती झालेली आहे ते. तेव्हा माणसाच्याकडून काही होत नाही. सगळे परमेश्वर करतो असं मी जर म्हटलं तर लोकांना वाटेल माताजी काही तरीच सांगतात. पण एकही जिवंत काम आपण करत नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल, आपण कामं काय करतो. आता दगड आहेत इथे, ते आणून इथे लावले, फरशा घातल्या आणि सांगितलं की आम्ही फार मोठे काम केले. एकही जिवंत कार्य आपण करू शकतो का? एका बी मधून एक तरी अंकुर आपण काढू शकता का? एक बी तरी आपल्याला घडवता येतं का? मग कसल्या गमजा मारायच्या. आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. काहीही तुम्ही करत नाही. सगळं मेलेलं काम आहे. अहो, हे उचलून तिकडे घाला, नाहीतर तिकडून इकडे घाला. त्याच्यात काय फरक पडणार आहे विशेष! उगीचच नसत्या उस्तापऱ्या आहेत. उलट ही असली कामे करून करून माणसाला आपण भौतिक गोष्टींची गुलामी करायला सांगितली आहे. आता समजा आमचे बिचारे हे विदेशी लोक आले आहेत. त्यांना एक त्रास होतो कधी कधी. ह्यांना खुर्चीवर बसण्याची सवय लागल्यामुळे ते खाली बसू शकत नाहीत. आता खुच्च्यांच्या डोक्यावर बसले. तर म्हटलं बरोबर खुर्च्या घेऊन फिरा आमच्याबरोबर. तुमचे कसं काय होणार हे समजत नाही मला. जमिनीवर बसायचं टाकलं. प्रत्येक अशा सवयी जडतात. ही भौतिकता इतकी वाढलेली आहे ती आपल्या डोक्यावर बसते. पण त्याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही सन्यास घ्या. मी लगेच म्हटल्याबरोबर लोकं सन्यासाला निघतात. सन्यास बिन्यास घेण्याची काही गरज नाही. व्यवस्थित लग्न करावं लग्न व्यवस्थाही परमेश्वरानेच केलेली आहे. आणि मुलंबाळे सांभाळावी. पण पावित्र्याने राहिलं पाहिजे. अशा आमच्या सहजयोगामध्ये अगदी साधारण, सर्वसामान्य जी लोकं आहेत आणि जी सर्वसामान्य पद्धतीने रहातात त्यांची व्यवस्था केलेली आहे. सन्याशाला आम्ही रियलायजेशन देऊ शकत नाही. जर कोणी मनुष्य सन्याशी बनून आमच्यासमोर येऊन उभा राहिला तर आम्ही त्यांना सांगू की हे बघा तुम्ही साधे कपडे घालून या. म्हणजे हे की जाहिराती लावून फिरायची काही गरज नाही. जो सन्यास आहे तो आपल्या आतमध्येच घडतो. अशा जाहिराती लावून बाहेर स्वत:च्या काहीतरी गमजा करणे म्हणजे खरोखर माकडाचे लक्षण आहे. माणसाने अशा भलत्या गोष्टींच्या लागू नये. आणि त्याच्यामध्ये पडू नये. हे फार चुकलेले आहे तसेच पुष्कळसे फिरतात. आणि आम्ही फार मोठे गुरू नादी गुरुसुद्धा संन्यासी बनून दाखवतात. अशा लोकांना गावाच्या वेशीबाहेर ठेवले पाहिजे. वगैरे १६ 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-16.txt सीतेने वाल्मीकी रामायणात सांगितले आहे की कुणी संन्यासी जर दारात आला तर त्याला वेशीच्या बाहेर ठेवायचे. एकच दिवस त्याला गावाच्या वेशीवर पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्याला पिटाळलं पाहिजे. अहो, आम्ही गृहस्थ लोक आमचा तुमचा काय संबंध? तुम्ही संन्यासी आहात तर जाऊन बसा जंगलात. इथे येण्याची गरज काय ? म्हणजे दुसऱ्यांच्या पैशावर कसं जिवंत रहायचं, हे बांडगुळासारखं आयुष्य, हे पॅरासायटिक आयुष्य आणि त्याच्यासाठी आमच्या सहजयोगामध्ये मुळीच वाव नाही. जर असे तुम्ही कुणी सन्यासी असाल, दंडे संन्यासी वगैरे तर आमचा तुम्हाला नमस्कार. आम्ही तुमच्यासाठी काही करू शकत नाही. जर तुम्ही सर्वसामान्य लोकांप्रमाणे लग्न वगैरे करून व्यवस्थित म्हणजे बॅचलर्सना पण चान्स आहे. जर असे असले, तर त्यांच्यासाठी आमचा सहजयोग आहे. कारण अशा माणसाला संतुलन येतं. मुलंबाळे घरात असली, आई-वडील असले तर माणसाला संतुलन येतं. मर्यादा येतात. तो काहीतरी व्यवस्थित वागतो. ज्या माणसाला आई नाही, वडील नाही, कुणी नाही अनाथलायासारखं कुठून तरी आलेला असेल किंवा ज्याला हे माहिती नाही की मर्यादा म्हणजे कशाशी खातात ? त्या माणसाला सहजयोग कसा आम्ही द्यायचा ? कारण मर्यादेनेच बांधला जातो आणि त्यानेच त्याची प्रगती होते. तुम्ही बघितलेले आहे झाडाचं सुद्धा तसंच मनुष्य आहे. झाडाचं बी-बियाणं जेव्हा फुगतं त्याला मर्यादा घालाव्या लागतात. त्याला संगोपावं लागतं. त्याला बघावं लागतं. आजकाल सगळे मानसशास्त्रज्ञ सांगायला लागले की जिथे जिथे गृह व्यवस्था बिघडलेल्या आहेत, जिथे जिथे समाज बिघडलेला आहे तिथली मुलं अगदी बेकार जातात. आणि जे जगामध्ये आपण एवढ युद्धं इतका कलह तसच लोकांच्यामध्ये भयंकर असंतोष वगैरे बघतो त्याच्या मुळाशी त्यांची घरं तुटलेली आहेत. त्यांना आई नाही, त्यांना वडील नाहीत, ती अनाथासारखे फिरणारी मुलं आहेत. म्हणून हे असं झालेलं आहे असं निदान त्यांनी काढलेलं आहे. तेव्हा दुसरं जे चक्र आहे, ज्याला आपण स्वाधिष्ठान चक्र म्हणतो, त्याच्यावरती श्री ब्रह्मदेव आणि त्यांची शक्ती सरस्वती ही आहे. पण कुंडलिनी शक्ती जी आहे ती कुमारिका गौरी शक्ती आहे. आणि आपल्याला माहिती आहे की या गणेशाला गौरीने कसं बनवलं आणि त्याला कसं आपल्या दाराबाहेर उभं केलं ते. आता त्यावरून असं लक्षात घ्यायचं की गणेश हा गौरीचं जे पावित्र्य आहे ते बघत असतो. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रोटोकॉल ते बघत तिथे बसलेले असतात. त्यांचे छेदन होत नाही. ते त्या ठिकाणी बसून फक्त ही संगोपना करत असतात. आता जे लोक या गणेशावर आघात करतात म्हणजे गणेश हा ज्या चक्रावर बसलेला आहे त्याने पेल्व्हीक प्लेक्सस म्हणून जे प्लेक्सस आहे त्याची चालना होते. सूक्ष्मामध्ये जरी ते मूलाधार चक्र असलं तरी त्याची चालना पेल्व्हीक प्लेक्ससमुळे होते. आणि या पेल्व्हीक प्लेक्ससमुळे सेक्ससुद्धा सांभाळला जातो. तर लहान मुलाला सेक्सच काही कळत नाही म्हणून तिथे एक लहान मूल कधीही मोठं होत नाही. नेहमी जे बाल्यावस्थेत, पवित्र अवस्थेत असतं अशा गणेशाला तिथे बसवलं आहे. जे आता जी घाणेरडी मंडळी, बरीच आहेत. तुमच्या पुण्याला सुद्धा एक गृहस्थ उद्भवले आहेत. ते असं घाणेरडं १७ 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-17.txt शिकवत असतात, की कुंडलिनी जागृत करायची असेल तर अशा घाणेरड्या पद्धतीने करायची. तर त्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे, तरी त्यांच्या लक्षात येणार नाही. त्यांना आई-बहिणी नाहीतच म्हणा. पण ही जी आई तुमची बसलेली आहे कुंडलिनी तिचं प्रोटोकॉल करणारा गणेश बसला असताना आपण अशा तऱ्हेची जी भाषा करतो कुंडलिनीला उचलायची म्हणजे आपल्या आईबरोबरच आपण काहीतरी घाणेरडा प्रकार म्हणत आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक हिंदुस्थानी आणि भारतीय माणसाला अशा गोष्टींची अत्यंत चीड आहे. आणि आपल्या देशातच अनेक लोक अशा गोष्टी करतात. आणि या तांत्रिकाने अशा घाणेरड्या गोष्टी करून आपल्या देशाला अगदी बरबाद करून टाकलंय. कोणताही मनुष्य जर आपल्या आईच्या पोटातून, उदरातून निघाला असेल आणि त्याची आई असली जगामध्ये आणि तिने पाहिलेलं असलं त्याला ही गोष्ट सहन होणार नाही. आणि ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अशा घाणेरड्यापणाच्या गोष्टी करणारे आणि पवित्र्यापासून तुम्हाला दूर नेणारे हे जे साधु-संत आपले नुसते पैसे भरत बसलेले आहेत आणि कॅडलक च्या गाड्या घेऊन फिरताहेत त्यांना उचलून लगेच समुद्रात तरी घालावं किंवा परदेशी पाठवून द्यावं. त्यांचं इथे काहीही चालू नाही दिलं पाहिजे. पण आश्चर्याची गोष्ट आहे की अशा लोकांकडे हिंदुस्थानी लोक सुद्धा जातात. मी तर असं ऐकलं आहे की काही मिनिस्टर लोकं सुद्धा तिथे जातात. म्हणजे या लोकांना तुम्ही निवडून तरी कसे देता याचं मला आश्चर्य वाटतं. आपल्या देशामध्ये आई म्हणजे काय? हे जर आपल्याला समजू नाही लागलंय, हे जर आपण विसरलो तर मात्र काहीही या देशाचं रहाणार नाही. एवढं समजलं पाहिजे की आई ही अत्यंत पवित्र व्यक्ती असते. आणि आपल्या आयुष्यात तिने आपल्याला पावित्र्य दिलेले असतं. आणि तिच्याबद्दल जे लोक असे बोलतात, ते लोक किती घातक आणि आपल्या देशाला किती नाशक आहेत, हे ओळखून राहिलं पाहिजे. आता त्याच्यावरती जे चक्र आहे त्याला आम्ही नाभी चक्र असं म्हणतो. मणिपूर चक्र असं पण त्याचं नाव आहे. आणि या नाभी चक्रावरची लक्ष्मी-नारायणाचं स्थान आहे. लक्ष्मीनारायण हे धर्म स्थापना करतात. धर्माची आपल्यामध्ये स्थापना होते. आणि लक्ष्मीचे जे सूत्र आहे, जे आपल्याला माहिती आहे ते म्हणजे आपण असा विचार करतो की या माणसाकडे लक्ष्मी आहे म्हणजे तो श्रीमंत असला पाहिजे. असा आपला अर्थ लागतो. पण लक्ष्मी आणि पैशात महदूंतर आहे. पैसा म्हणजे लक्ष्मी नाही. आणि लक्ष्मी म्हणजे पैसा नाही. एक अंग त्याचा पैसा जरी असला, त्याने समृद्धी जरी असली तरी लक्ष्मी स्वरूप वेगळें असतं. आता थोडक्यात मी लक्ष्मीबद्दल सांगते. लक्ष्मीला पाहिलेलं आहे की लक्ष्मीचा एक हात असा असतो आणि एक हात असा असतो. आणि दोन हातात तिच्या कमळं असतात. म्हणजे जो मनुष्य लक्ष्मीपती असेल त्याचं हृदय कमळासारखं असायला पाहिजे. ते गुलाबी म्हणजे त्याच्यामध्ये ओलावा असला पाहिजे. प्रेम असलं पाहिजे. तसंच त्याच्या घरामध्ये कमळासारखं सौंदर्य असलं पाहिजे. त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या वागण्यात, कपड्यात, सगळ्यामध्ये कमळासारखं सौंदर्य असायला पाहिजे. जसा एक भुंगा सुद्धा कमळामध्ये जाऊन बसू १८ 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-18.txt शकतो. त्याचे सगळे काटे जरी बोचले तरी कमळ जसं त्याला आपलं आवरण घालून घेते आणि रात्री त्याला झाकून आरामात झोपायला मिळते. तसेच एखाद्या लक्ष्मीपतीने करायला पाहिजे. पण लक्ष्मीपती नंबरी चिडका असतो. तेव्हा अशा माणसाला आपण लक्ष्मीपती म्हणण्यापेक्षा फक्त आपण पैसेवाला म्हटलं तर ते योग्य होणार आहे. असे लक्ष्मीपती आजकाल नाहीत. पण आमच्या वेळेला म्हणजे आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे होतो, तरुण होतो, त्यावेळेला आम्ही असे पुष्कळ लोक पाहिलेले आहेत. आता तुम्ही दुर्देवी आहात त्याबाबतीत तेव्हा तुम्हाला सगळे भाडोत्री लोकच दिसतात. आमच्या वेळेला आम्ही खरोखरच काही काही फार मोठी मंडळी पाहिली होती ज्यांना खरच आम्ही लक्ष्मीपती म्हणू शकत होतो. आता दुसर्या हातामध्ये हे दान आहे. अशा माणसाच्या हातून अव्याहत दान चाललं पाहिजे. आणि या हातातून आश्रय आहे. जर आश्रयाला लोक आले तर ते आश्रयाला राहिले पाहिजेत. त्याला लक्ष्मीपती असं म्हटलं पाहिजे. तसंच लक्ष्मी ही स्वत: स्त्री स्वरूप, माता स्वरूप आहे. त्या माणसाचं स्वरूप माता स्वरूप असायला पाहिजे. असं आपल्याकडे अनेक जन्मांपूर्वी, अनंत कालापासून आपण अशी लक्ष्मीची स्थापना या देशामध्ये केलेली आहे. एवढा आपला महान देश आहे. अशी कल्पना ह्या भौतिकवादी लोकांना येणार आहे का? भोगी लोक आहेत. त्यांच्या डोक्यात येणार आहे का? एकेका पैशासाठी हे दुसऱ्यांचा गळा कापणारे लोक आहेत. त्यांच्या डोक्यात काही घुसणार आहे. हा फक्त आपल्याला एक वारसा मिळालेला आहे. तो वारसा आपण सोडायचा नाही. अभिमानाने राहिले पाहिजे. जरी आपण गरीब असलो तरी हृदयाने आपण श्रीमंत आहोत हे लक्षात असायला पाहिजे. मनुष्य गरिबी आणि श्रीमंतीने श्रीमंत होत नाही. हृदयाने श्रीमंत होतो. आता आम्हाला असं आहे की आमच्याकडे खुप श्रीमंती होती, वडिलांकडे, आणि आमचे यजमानसुद्धा फार श्रीमंत आहेत. पण आम्हाला जर तुम्ही सांगाल तर आम्ही कुठे वरती झोपायला जाऊ अगदी आरामात, नाहीतर आम्हाला रस्त्यावर म्हणता तर आम्ही तेथेदेखील झोपू शकू. कारण आम्ही अगदी मस्त आहोत. आम्हाला कशाची गरज नाही. असाच मनुष्य ज्याला कशाचीही गरज नाही तोच खरा बादशहा आहे. बाकी ज्याला गरज आहे, दुसऱ्याच्याकडे इर्षेने बघतो त्या माणसाला आपण बादशहा म्हणू शकत नाही. तेव्हा हे लक्ष्मीचं आपल्या नाभीवरती एक फार मोठ दैवत आहे. या लक्ष्मीला आपण जपलं पाहिजे. हे सौष्ठव आपल्यामध्ये सांभाळालं पाहिजे. आणि त्या सौष्ठवाला आपल्या देशात अजून लोक जपून आहेत. अजून त्यांना माहिती आहे की पैसाच म्हणजे सगळं काही नाही. त्याच्याही पलीकडे धर्म ही फार मोठी गोष्ट आहे. आणि धार्मिकतेने रहाणे म्हणजे देवळात जाऊन पोपटपंची करणं, असं मी म्हणत नाही. धार्मिकतेचा जो अर्थ आहे तो आपल्याला अनेक गुरूंनी सांगितलेला आहे. आणि अशा आपल्या या संतांच्या भूमीमध्ये अनेक गुरू आलेत आणि त्यांनी त्याबद्दल पुष्कळ चर्चा केली, की धर्म काय ? या गुरूंचे जितके उपकार मानावे तितके थोडे आहेत पण आपण त्यांची कोणतीही गोष्ट ऐकत नाही. त्यापैकी दहा मुख्य गुरू झाले आणि ते अनेकदा या संसारात आले आहेत. पैकी मोहम्मद साहेबसूद्धा दत्तात्रेयाचे साक्षात अवतरण आहे. मोहम्मद १९ 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-19.txt साहेबांनंतरसुद्धा जे अवतरण झाले ते नानकसाहेबसुद्धा त्यांचे साक्षात अवतरण आहे. जनक सुद्धा त्यांचे अवतरण आहे. तसेच आदिनाथ वगैरे जे महावीरांचे आदि झालेले आहेत ते सुद्धा ह्यांचेच अवतरण आहे. त्यानंतर अगदी आपण फारच नशीबवान आहोत. विशेषत: अहमदनगरचे लोक की आपले इथे साईनाथ जे इथं शिर्डीला येऊन राहिले ते सुद्धा साक्षात दत्ताचेच अवतार आहेत. एकच तत्त्व जे आहे गुरूचं ते अनेकदा संसारात येतं आणि त्यांनी ज्या अनेक गोष्टी शिकवल्या त्या धर्माच्या संतुलनाबद्दल. त्यांनी रियलाझेशन वर्गैरे देण्याच्या गोष्टी नाही केल्या. आत्मज्ञान देण्याच्या फारशा गोष्टी केलेल्या नाहीत. पण जी गोष्ट त्यांनी मुख्य सांगितली आश्चर्याची सगळ्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की दारू प्यायची नाही. ते सगळे एकतर वेगळे होतील किंवा आजकालचे जे लोक दारूच्या विरूद्ध लिहितात ते तरी वेडे असतील. तर दारू प्यायची नाही त्याला कारण म्हणजे फार सायंटिफिक आहे. परवा मी केमिस्ट्रीच्या प्रोफेसरना सांगत होते की किती सायंटिफिक रिझन आहे की ज्याने दारू प्यायची नाही. दारू आणि कॅन्सर एकच तऱहेचा प्रकार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे ओएच आयर्न असतं त्या ओएच आयर्नची अशी स्थिती होऊन जाते, दारू आणि कॅन्सरमध्ये दोन्हीमध्ये एकच स्थिती होऊन जाते. तुमच्यामध्ये जी काही गरमी होते किंवा जी हीट, काम केल्यामुळे जी हीट निर्माण होते ती तुमच्या रक्तवाहिन्यातून वाहू शकत नाही. कारण त्याच्यातलं जे पाणी आहे, त्याचं जे ओएच आयर्न आहे ते शोषण करू शकत नाही. कारण त्याची पद्धती बदलते. आणि त्यामुळे संबंध गरमी तुमच्या लिव्हरमध्ये, पोटामध्ये तऱ्हेतऱ्हेच्या गरम्या एकत्र होतात. आता मी सांगायचं म्हणजे कॅन्सर हा सहजयोगाने ठीक होऊ शकतो, आणखीन कशाने होऊ शकत नाही. आणि हे आम्ही केलेले आहे. आता लंडनला आम्ही एका कॅन्सरच्या पेशंटला बरं केलेले आहे. आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या तिथल्या प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांनी आता तिथे आमचं मेडिकल कॉलेज वगैरे बरंचसं काढलेले आहे की तुम्ही आता इथे बोला वगैरे. आता बघू गेल्यावर काय होईल ते. तर त्याच्यामध्ये त्या बाईला इतकी हीट होती अंगामध्ये. सारखी हीट निघायला लागली. आणि इतकी लंडनला थंडी पडत असतांनासुद्धा तिने सगळी दारं उघडी टाकली आणि ती म्हणे की माझ्या अंगात तर इतकी हीट निघती आहे आणि सगळ्यांना वाटायला लागले की हिटर आहे. तसंच दारूङ्या माणसाचं होतं. दारूडा जो असतो, जो मनुष्य दारू पितो, त्याच्यासुद्धा लिव्हरमध्ये हीट जमा होते, मग त्याच्या किडनीमध्ये हीट जमा होते. मग त्याच्या संबंध रक्तवाहिन्या ज्या असतात त्या हार्डन होऊन जातात. आता त्यांनी सांगितलं की तुम्ही दारू पिऊ नका. आता हे मी असं म्हटलं की तुम्ही दारू पिऊ नका तर तुम्ही मुळीच ऐकणार नाही. उलट कोणी इथं येणार नाही. परवा मी जरा म्हटलं की तुम्ही शपथ घ्या की तुम्ही दारू पिणार नाही तर अर्धे लोक उठूनच गेले. अहो म्हटलं मी म्हटलं तुम्ही नुसती शपथ घ्या. मी काही म्हटलं नाही की त्याच्यासाठी तुम्हाला काही पेमेंट करावं लागेल. पण तेवढं म्हटल्याबरोबर अर्धे लोकं उठून गेले. आता दारू इतकी नुकसानाची वस्तू आहे की कुणी आई म्हणेल का की तुम्ही आपलं नुकसान करून घ्या. 'ये बाई मला मार' अशातली स्थिती आहे तुमची. ते आपले रस्त्याने ठीक २० 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-20.txt चाललेले आहेत. त्याशिवाय झिंगलेला मनुष्य तुम्ही पाहिलेला नाही का. आता रस्त्यानेच येतांना आम्ही तीन अॅक्सीडेंट पाहिले. त्यातील एक मनुष्य दाखू पिऊन रस्त्यात असा लोळत पडलेला होता. आणि हे म्हणजे अगदी रोज आपण बघतो आहे. तरीसुद्धा लोकांनी मला सांगितलं की हिंदुस्थानात आता दारू वाढलेली आहे. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. तेव्हा ही जी आपली फार मोठी दुश्मन आहे अशी जी आपली शत्रू आहे तिला आपल्या डोक्यावर बसवून काय शहाणपण दाखवतो आहे मला समजत नाही. पण तरीही सहजयोगात आम्ही कुणाला म्हणत नाही की तुम्ही दारू सोडा. जसं आता चव्हाण साहेब म्हणाले की, 'माताजी, काही सोडायला सांगत नाहीत.' ही गोष्ट खरी आहे. आम्ही काही सांगत नाही. तुम्ही आज सोडा. किंवा आत्ता सोडा. पण पार झाल्यावर तुम्ही सोडणार. आता इथे जी मंडळी आली आहेत परदेशातून अशी तीनशे मंडळी आम्ही लंडनला फार सुंदर केलेली आहेत. त्याशिवाय हजारो लोकांनी रियलायझेशन घेतलेले आहे. पण तीनशे मंडळी फार छान आहेत. त्यातले बहुतेक दारूडे होते, ड्रग्ज घेत असत. पण ह्यांचं सगळ्यांचं सुटलं. कसं सुटलं? म्हणजे असं आहे जेव्हा आत्म्याची ओळख झाली. आत्मतत्त्वाचं स्पंदन सुरू झालं, जेव्हा आतला आनंद येऊ लागला तेव्हा मनुष्याला हे सगळे सुचतच नाही. आपोआप सगळें सुटतं. हा आनंद इतका आगळा आहे मग त्या आनंदापुढे काही सुचतच नाही. त्यानंतर हे जे काही लक्ष्मीतत्त्व आहे, त्या लक्ष्मीतत्त्वामुळे जेव्हा हे जागृत होतं तेव्हा एक मोठं कार्य घडतं आणि ते असं की तुमची सांपत्तिक स्थिती सुद्धा सुधारते. आश्चर्याची गोष्ट आहे. लोकांना आश्चर्य वाटेल की माताजी हे काय सांगताहेत. आमचं इकॉनॉमिक्स एकीकडे गेलं आणि सांपत्तिक स्थिती कशी सुधारेल. तर असं आहे की लक्ष्मीतत्त्वाने अशी सांगड बसते की त्या सांगडीमुळे सांपत्तिक स्थिती सुधारते. आता आमचे जसे हे विद्यार्थी आहेत इथून आलेले. यांना मी विचारलं ह्यांच्याजवळ पूर्वी काहीही नव्हतं अगदी भणंग भिकाऱ्यासारखे रहात होते. आणि एवढे श्रीमंत, ह्यांच्याजवळ एवढे पैसे, सगळं काही. ह्यांना काही रहाण्याची सोय नव्हती, काही नाही. मी म्हटलं की, 'ही काय तुमची रहाणी आहे. असं कसं रहाता तुम्ही?' त्याच्यानंतर मग हे माझ्याकडे आले आणि त्यांना पार झाल्यानंतर लगेच ह्यांची घरं व्यवस्थित, त्यांची रहाणी व्यवस्थित, ह्यांच्याकडे रेडिओग्राम, कधी काही, कधी काही म्हटलं हे कुठून आणायला लागले. तुमच्याजवळ पूर्वी खायलासुद्धा पैसे नसायचे. म्हणे आता दारू बंद झाली ना! तिकडे जातात अर्धे पैसे. महागाई भत्ता कशाला ? गुत्त्यात जायला. तुम्हाला काही खायला मिळत नाही अशातली गोष्ट नाही. पण त्याच्यामध्ये काही हरकत नाही तुम्ही गुत्तयात जरी गेले, पण त्यानं होतं काय ? तुमची लक्ष्मी पडते. बाटली आली की तिकडून लक्ष्मीबाई गेल्या. कोणत्याही दारूड्या माणसाचे आपण पुतळे उभे करत नाही इकडून कारण त्यांची स्थितीच नसते पुतळे उभे करण्यासारखी. आणि म्हणून दारू, सिगरेट या सर्व गोष्टींना ह्या लोकांनी मना केले होते. आणि हे फार महत्त्वाचे आहे. ह्याचे आपल्याला महत्त्व समजत नाही. फारच महत्त्वाचे आहे हे माणसाला. कारण ते चेतनेच्या विरूद्ध जातं. ज्या चेतनेने परमेश्वराला जाणायचे आहे त्या चेतनेच्या विरूद्ध ही २१ 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-21.txt गोष्ट जाते. ती किती वाईट असेल आणि किती हानीकारक असेल हे लक्षात आणलं पाहिजे. त्याच्या वरती जे चक्र आहे त्याला हृदय चक्र असे म्हणतात. हृदय चक्र. कारण ते इथे मधे फुफ्फुसाच्या मधोमध असते. आणखीन हे फारच महत्त्वाचे आहे. कारण या चक्रावर जगदंबेचे स्थान आहे. मनुष्याला जेव्हा जेव्हा भीती वाटते तेव्हा तो आपल्या आईला आठवतो. जर त्याच्या लक्षात ही गोष्ट आली की तुझी आई ही जगन्माता आहे. अत्यंत शक्तीशालीनी आहे. वाट्टेल ते जरी झालं तरी ती तुझा बचाव करेल. आपण आता जगदंबेविषयी पुष्कळ ऐकलेले आहे पुष्कळ राक्षसांना मारून टाकले. काय काय त्यांनी केलेले आहे. तसंच एकदा फार रागावल्या होत्या त्यांनीच तांडव नृत्य सुरू केल्याबरोबर शंकराला समजेना की आता काय होणार? आई बिघडली तर काय होणार ? स्वत:च तिच्या मुलाला तिच्या पायाखाली घातल्याबरोबर अगदी अलगद आपला पाय ठेऊन एवढी मोठी जीभ त्यांनी काढलेली आहे असं आपण वाचलेले आहे. आणि सगळी गोष्ट खरी आहे. आणि त्याचं प्रत्यंतर आपल्या आयुष्यात येतं म्हणजे जेव्हा मनुष्य ज्याला सेन्स ऑफ इनसिक्युरिटी म्हणतात किंवा जेव्हा त्याला असुरक्षित असं वाटायला लागतं किंवा आता माझ्यावरती काहीतरी संकट येणार आहे, काही तरी होणार आहे असं वाटू लागतं त्यावेळेला आपलं हृदय धडधड होऊ लागतं. हृदय धडधड होण्याचे हे कारण आहे की आपले हे चक्र जे आहे ते भ्रमित होते. तिथून ती शक्ती नष्ट होते किंवा लुप्त पावते. ज्या माणसाला विशेष करून काहीतरी भूतबाधा वरगैरे अशी जी भीती वाटते की आम्हाला भूत लागले आहे, आम्ही बाहेर गेलो तर आम्हाला काहीतरी धरलंय वगैरे असे वाटत असते त्यांचीसुद्धा हीच स्थिती. जेव्हा हे चक्र रक्षित होते, जेव्हा हे चक्र आलोकित होते तेव्हा माणसाची रक्षा वाढते. आता पुष्कळ बायकांना ब्रेस्ट कॅन्सरचा आजार असतो. आता ते लोकांना असे वाटते की ब्रेस्ट कॅन्सरचा आजार म्हणजे काहीतरी दुसऱ्या कारणामुळे झालेला आहे. पण अगदी सरळ गोष्ट आहे की जर त्या बाईला असुरक्षित वाटत असेल तर तिला ब्रेस्ट कॅन्सरचा आजार होईल. तसंच आपल्याला पुष्कळांना श्वासाचा आजार असतो. आम्ही अनेक श्वासाचे रोग काढलेले आहेत आणि बरे केलेले आहेत. आपले काश्मिरचे जे गव्व्हनर, सहाय साहेब होते. भगवान सहाय साहेब, त्यांना पंचवीस वर्षाचा श्वासाचा रोग होता. तो ही पाच मिनिटात बरा केला. म्हणजे जर तुम्ही हे चक्र व्हायब्रेशन्स देऊन किंवा चैतन्य लहरी देऊन स्थित केलं तर अगदी मनुष्याला नेहमीसाठी बरं वाटतं कारण त्याचं ते चक्र ठीक झाल्याबरोबर जगदंबा जागृत होऊन त्याच्यामध्ये जी असुरक्षितपणाची भावना आहे ती नष्ट होऊन तो अगदी सुखासमाधानाने राहू लागतो. ( उर्वरित भाग पुढील अंकात) २२ 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-22.txt ाभ र ... श्री गणेश सवप्रथम स्थाफित केलेले दैवत आहे. हे बीज आहे आणि बीजापासूनच संपूर्ण विश्व निधून परत त्याच्यातच समावले जाते. विश्वामध्ये जे काही आहे, श्री गणेश त्याचेच बीज आहे, ...२्व लोक प्रथम याठीच श्री गणेशाली प्रमुख देवता मानले जाते. श्री गणेशाचे पूजन करतीत, याचे कारण म्हणजे परमेश्वराने श्री गणेश तत्त्व स्वत पहिले या सष्टीमध्ये स्थापित केले आहे. प. पू.श्रीमाताजी, एप्रिल १९८३ प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौरसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन ०२० - २५२८६५३७, २५२८६७२०, e-mail : sale@nitl.co.in 2012_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-23.txt सहजयोग अशी गोष्ट आहे, अशी एक पद्धत आहे, जी परमे१्वराची आपली पद्धत आहे, ज्यामुळे आपल्या होतामधून ही व्हायब्रेशन्स वाहू लागतात, पायामधून वाहू लागतात, सर्व शरीरतून वाहू लागतात, जसे सूाचा प्रकाश आहे आणि इतरांमध्ये, त्यांच्या प्रेमामध्ये जाऊन त्यालाही ते वेग देऊ शकतील की त्याच्या आतमधूनही ते वाहू लागेल १ आणि एक प्रकारची चेन रिअॅक्शन बनवेल. प. पू.9 श्री माताजी, मुंबई, २७.३.१९७४ - ाी